शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

वर्धेचा रणसंग्राम : चुरशीची लढत - पक्ष, नेत्यांसह उमेदवारांचीही होणार सत्वपरीक्षा

By रवींद्र चांदेकर | Published: April 02, 2024 4:48 PM

२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांना ५ लाख ७८ हजार ३६४, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना ३ लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती.

वर्धा : गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील मतांचा फरक कमी झाल्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्ष, नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची सत्वपरीक्षा घेणारी ठरणार आहे.

२०१४ मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या विजयी व पराभूत उमेदवारांमध्ये २ लाख १५ हजार ७८३ मतांचा फरक होता. हाच फरक २०१९ च्या निवडणुकीत जवळपास २८ हजार मतांनी कमी होऊन १ लाख ८७ हजार १९१ वर आला होता. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांना ५ लाख ३७ हजार ५१८, तर काँग्रेसचे सागर मेघे यांना ३ लाख २१ हजार ७३५ मते मिळाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांना ५ लाख ७८ हजार ३६४, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना ३ लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. या दोन्ही निवडणुकीत जय आणि पराजयामधील मतांचे अंतर काही प्रमाणात कमी झाले होते. त्यामुळे यावेळी मतदार कुणाची हमी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०१९ मध्ये रामदास तडस यांना झालेल्या एकूण मतदानाच्या ५३.९२ टक्के, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी चारुलता टोकस यांना ३६.४७ टक्के मते मिळाली होती. या दोघांमध्ये १७.४५ टक्के मतांचा फरक होता. त्यामुळे यावेळी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

सर्वात कमी मतांनी झालेले विजय

२००४ च्या निवडणुकीत भाजपचे सुरेश वाघमारे यांनी काँग्रेसच्या प्रभा राव यांचा केवळ ३ हजार १८८ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी रिंगणातील उर्वरित पाच उमेदवारांना ५ हजारांपेक्षा जस्त मते मिळाली होती. तत्पूर्वी १९९९ मध्ये काँग्रेसच्या प्रभा राव यांनी भाजपाचे सुरेश वाघमारे यांचा ७ हजार ५९ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता मेघे यांनी १ लाख ५२ हजार ८५६ मते घेतली होती, हे विशेष.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४