शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

बँक ही जनतेची संपत्ती ती कर्जबुडव्यांना विकू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

तत्कालीन पंतप्रधानांनी १९६९ साली दूरदृष्टी ठेवून बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने समाजातील शेवटच्या घटकाला बँकांची पायरी चढता आली. पण, आता शासनाने धनदांडग्या कर्जबुडव्यांना बँक विकण्याचा घाट रचला आहे. या राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना बँक व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीयीकृत बँक ही जनतेची संपत्ती आहे. ती कर्जबुडव्यांना विकून खासगीकरण करू नका, अशा मागणीकरिता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने दोन दिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे आज पहिल्या दिवशीच जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकाच्या शाखा बंद असल्याने व्यवहार प्रभावित झाले.तत्कालीन पंतप्रधानांनी १९६९ साली दूरदृष्टी ठेवून बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने समाजातील शेवटच्या घटकाला बँकांची पायरी चढता आली. पण, आता शासनाने धनदांडग्या कर्जबुडव्यांना बँक विकण्याचा घाट रचला आहे. या राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना बँक व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे खासगीकरणापासून राष्ट्रीयीकृत बँकांना वाचविण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या १३१ शाळा १६ आणि १७ डिसेंबरला बंद राहणार आहे. आज पहिल्या दिवशी सर्व शाखा बंद करुन बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटन विदर्भ युनिटने हातात फलके घेऊन शासनाच्या या खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.  दोन दिवस बँकाचा संप राहणार असून शनिवारनंतर रविवारी सुटी आली आहे. त्यामुळे खातेदारांचीही मोठी अडचण होणार असून एटीएममध्येही ठणठणाट होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

खासगीकरणाचा काय होणार परिणाम...-   खाते उघडण्याकरिता पाच ते दहा हजार लागणार, लहान खातेदारांना कर्ज मिळीणे कठीण, चार्जेसच्या नावावर ग्राहकांचे शोषण. शेतकऱ्यांना कमी व्याजदारात पीककर्ज मिळणे बंद होऊन सक्तीने वसुली करणार. कर्जावरील व्याजाचा दर खासगी बँका ठरवतील. सरकारी योजना राबविणे कठीण जाणार. अनुदानासाठी खाते उघडणे अडचणीचे ठरतील. खासगी बँक श्रीमंतांना किंवा फायदा असणाऱ्यांनाच सेवा देणार तसेच बँक बुडण्याचेही प्रमाण वाढणार.

राष्ट्रीयीकृत बँकाच्या खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने दोन दिवस संप पुकारला आहे. राष्ट्रीयीकृत बँका ही जनतेची संपत्ती आहे. त्यामुळे खासगीकरण थांबवून ती धनदांडग्यांना विकून सर्वसामान्यांचे अहित साधले जाऊ नयेत,अशी आमची मागणी आहे. जिल्ह्यातील १३१ बँक शाखातील कर्मचारी या संपात सहभागी असून, दोन दिवसांत ४०० कोटींचे व्यवहार प्रभावित होणार आहे. या संपानंतरही शासनाने दखल घेतली नाही तर बँक कर्मचाऱ्यांना बेमुदत संप करावा लागेल.- वैभव लहाने, पदाधिकारी, बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटन विदर्भ युनिट 

 

टॅग्स :bankबँकStrikeसंप