शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

बँक ही जनतेची संपत्ती ती कर्जबुडव्यांना विकू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

तत्कालीन पंतप्रधानांनी १९६९ साली दूरदृष्टी ठेवून बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने समाजातील शेवटच्या घटकाला बँकांची पायरी चढता आली. पण, आता शासनाने धनदांडग्या कर्जबुडव्यांना बँक विकण्याचा घाट रचला आहे. या राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना बँक व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीयीकृत बँक ही जनतेची संपत्ती आहे. ती कर्जबुडव्यांना विकून खासगीकरण करू नका, अशा मागणीकरिता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने दोन दिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे आज पहिल्या दिवशीच जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकाच्या शाखा बंद असल्याने व्यवहार प्रभावित झाले.तत्कालीन पंतप्रधानांनी १९६९ साली दूरदृष्टी ठेवून बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने समाजातील शेवटच्या घटकाला बँकांची पायरी चढता आली. पण, आता शासनाने धनदांडग्या कर्जबुडव्यांना बँक विकण्याचा घाट रचला आहे. या राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना बँक व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे खासगीकरणापासून राष्ट्रीयीकृत बँकांना वाचविण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या १३१ शाळा १६ आणि १७ डिसेंबरला बंद राहणार आहे. आज पहिल्या दिवशी सर्व शाखा बंद करुन बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटन विदर्भ युनिटने हातात फलके घेऊन शासनाच्या या खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.  दोन दिवस बँकाचा संप राहणार असून शनिवारनंतर रविवारी सुटी आली आहे. त्यामुळे खातेदारांचीही मोठी अडचण होणार असून एटीएममध्येही ठणठणाट होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

खासगीकरणाचा काय होणार परिणाम...-   खाते उघडण्याकरिता पाच ते दहा हजार लागणार, लहान खातेदारांना कर्ज मिळीणे कठीण, चार्जेसच्या नावावर ग्राहकांचे शोषण. शेतकऱ्यांना कमी व्याजदारात पीककर्ज मिळणे बंद होऊन सक्तीने वसुली करणार. कर्जावरील व्याजाचा दर खासगी बँका ठरवतील. सरकारी योजना राबविणे कठीण जाणार. अनुदानासाठी खाते उघडणे अडचणीचे ठरतील. खासगी बँक श्रीमंतांना किंवा फायदा असणाऱ्यांनाच सेवा देणार तसेच बँक बुडण्याचेही प्रमाण वाढणार.

राष्ट्रीयीकृत बँकाच्या खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने दोन दिवस संप पुकारला आहे. राष्ट्रीयीकृत बँका ही जनतेची संपत्ती आहे. त्यामुळे खासगीकरण थांबवून ती धनदांडग्यांना विकून सर्वसामान्यांचे अहित साधले जाऊ नयेत,अशी आमची मागणी आहे. जिल्ह्यातील १३१ बँक शाखातील कर्मचारी या संपात सहभागी असून, दोन दिवसांत ४०० कोटींचे व्यवहार प्रभावित होणार आहे. या संपानंतरही शासनाने दखल घेतली नाही तर बँक कर्मचाऱ्यांना बेमुदत संप करावा लागेल.- वैभव लहाने, पदाधिकारी, बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटन विदर्भ युनिट 

 

टॅग्स :bankबँकStrikeसंप