शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

बँक ही जनतेची संपत्ती ती कर्जबुडव्यांना विकू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

तत्कालीन पंतप्रधानांनी १९६९ साली दूरदृष्टी ठेवून बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने समाजातील शेवटच्या घटकाला बँकांची पायरी चढता आली. पण, आता शासनाने धनदांडग्या कर्जबुडव्यांना बँक विकण्याचा घाट रचला आहे. या राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना बँक व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीयीकृत बँक ही जनतेची संपत्ती आहे. ती कर्जबुडव्यांना विकून खासगीकरण करू नका, अशा मागणीकरिता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने दोन दिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे आज पहिल्या दिवशीच जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकाच्या शाखा बंद असल्याने व्यवहार प्रभावित झाले.तत्कालीन पंतप्रधानांनी १९६९ साली दूरदृष्टी ठेवून बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने समाजातील शेवटच्या घटकाला बँकांची पायरी चढता आली. पण, आता शासनाने धनदांडग्या कर्जबुडव्यांना बँक विकण्याचा घाट रचला आहे. या राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना बँक व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे खासगीकरणापासून राष्ट्रीयीकृत बँकांना वाचविण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या १३१ शाळा १६ आणि १७ डिसेंबरला बंद राहणार आहे. आज पहिल्या दिवशी सर्व शाखा बंद करुन बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटन विदर्भ युनिटने हातात फलके घेऊन शासनाच्या या खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.  दोन दिवस बँकाचा संप राहणार असून शनिवारनंतर रविवारी सुटी आली आहे. त्यामुळे खातेदारांचीही मोठी अडचण होणार असून एटीएममध्येही ठणठणाट होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

खासगीकरणाचा काय होणार परिणाम...-   खाते उघडण्याकरिता पाच ते दहा हजार लागणार, लहान खातेदारांना कर्ज मिळीणे कठीण, चार्जेसच्या नावावर ग्राहकांचे शोषण. शेतकऱ्यांना कमी व्याजदारात पीककर्ज मिळणे बंद होऊन सक्तीने वसुली करणार. कर्जावरील व्याजाचा दर खासगी बँका ठरवतील. सरकारी योजना राबविणे कठीण जाणार. अनुदानासाठी खाते उघडणे अडचणीचे ठरतील. खासगी बँक श्रीमंतांना किंवा फायदा असणाऱ्यांनाच सेवा देणार तसेच बँक बुडण्याचेही प्रमाण वाढणार.

राष्ट्रीयीकृत बँकाच्या खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने दोन दिवस संप पुकारला आहे. राष्ट्रीयीकृत बँका ही जनतेची संपत्ती आहे. त्यामुळे खासगीकरण थांबवून ती धनदांडग्यांना विकून सर्वसामान्यांचे अहित साधले जाऊ नयेत,अशी आमची मागणी आहे. जिल्ह्यातील १३१ बँक शाखातील कर्मचारी या संपात सहभागी असून, दोन दिवसांत ४०० कोटींचे व्यवहार प्रभावित होणार आहे. या संपानंतरही शासनाने दखल घेतली नाही तर बँक कर्मचाऱ्यांना बेमुदत संप करावा लागेल.- वैभव लहाने, पदाधिकारी, बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटन विदर्भ युनिट 

 

टॅग्स :bankबँकStrikeसंप