शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

सेवाग्राम येथील मेडिकल चौक परिसरापासून वर्धेकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा कडूनिंबाची आणि अन्य जातींची मोठी वृक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही वृक्ष कुठलाही स्वार्थ न ठेवता मानवासह जिवजंतुंना प्राणवायू देत आहेत. या वृक्षांमुळे या मार्गाच्या सौदर्यातही भर पडली आहे. महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सेवाग्राम परिसरात त्यांच्या काळापासूनची काही वृक्ष आहेत. त्यांच्या काळानंतरही कार्यकर्त्यांनी काही वृक्ष लावले होते.

ठळक मुद्देविकासाच्या नावावर कत्तल : रस्ते होताहेत ओसाड

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जग ग्लोबल वार्मिंगच्या विळख्यात असल्याची ओरड होत असतानाच विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांअभावी रस्ते भकास होत चालल्याचे चित्र वर्धा ते सेवाग्राम मार्गावर पहावयास मिळत आहे.सेवाग्राम येथील मेडिकल चौक परिसरापासून वर्धेकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा कडूनिंबाची आणि अन्य जातींची मोठी वृक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही वृक्ष कुठलाही स्वार्थ न ठेवता मानवासह जिवजंतुंना प्राणवायू देत आहेत. या वृक्षांमुळे या मार्गाच्या सौदर्यातही भर पडली आहे. महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सेवाग्राम परिसरात त्यांच्या काळापासूनची काही वृक्ष आहेत. त्यांच्या काळानंतरही कार्यकर्त्यांनी काही वृक्ष लावले होते. सेवाग्राम विकास आराखडा मंजूर केल्यानंतर विकासात्मक कामाला गती देण्यात आली. रस्त्यांच्या रुंदिकरणासोबत सौदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने या मार्गावरील डेरेदार वृक्षांवर कुऱ्हाड पडली. सेवाग्राम आणि बापूंचा आश्रम जगासमोर प्रेरणास्थान आहे. परिसर सुशोभित असणे गरजेचे आहे. पण, प्राणवायू देणाऱ्याआणि पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रवृत्तीला आळा घालण्याची मागणी होत आहे.जिल्हा पर्यावरण संरक्षण समितीच्या बैठकीत झाडांना धोका होऊ नये. जी तोडायची असेल त्याची रितसर परवानगी घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला होता.पण, या मार्गावरील कामात लबाडी केल्याचे दिसून येत आहे. झाडे तोडायची नाही पण, त्यांना मारण्याची उपाययोजना करण्यात आली आहे. बांधकामा दरम्यान झाडांच्या मुळांना धक्का पोहोचविल्याने ती झोड जगणे आता कठीण झाले आहे.-मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष निसर्ग सेवा समिती

टॅग्स :forestजंगल