शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी नगरपालिकेचा फेरीवाल्यांना मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

आर्वी नगरपालिकेने विशेष निधी खर्च करून येथील इंदिरा चौकात फळ विक्रेते व भाजीविके्रत्यांसाठी व्यवसायाची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु हातगाडीवर भाजी व फळाचा व्यवसाय करणारे तेथे जाण्यास तयार नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासणाचीही अडचण होत आहे. नगरपालिकेने शिवाजी चौक ते गांधी चौक मार्गावरील फेरीवाल्यांना नोटीस बजावून कार्यवाही सुरू केल्याने हा मार्ग अनेक वर्षांनतर मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देबाजारात उडाला गोंधळ : पथकाने हातगाडी केली जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : येथील नेहरु मार्केटच्या दारावर असलेल्या भाजी व फळ विक्रेत्यांना नगरपालिकेने दिलेल्या जागेवर व्यवसाय करावा, असे सांगत नगरपालिकेच्या पथकाने हटविण्याचा प्रयत्न केला. आज गुरुवारी बाजाराचा दिवस असल्याने फेरीवाल्यांनी आजही त्याच ठिकाणी विक्री सुरु केल्याने पालिकेच्यावतीने मज्जाव करीत हातगाडी जप्त केली. त्यामुळे नेहरु मार्केट परिसरात गोंधळ उडाला होता.आर्वी नगरपालिकेने विशेष निधी खर्च करून येथील इंदिरा चौकात फळ विक्रेते व भाजीविके्रत्यांसाठी व्यवसायाची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु हातगाडीवर भाजी व फळाचा व्यवसाय करणारे तेथे जाण्यास तयार नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासणाचीही अडचण होत आहे. नगरपालिकेने शिवाजी चौक ते गांधी चौक मार्गावरील फेरीवाल्यांना नोटीस बजावून कार्यवाही सुरू केल्याने हा मार्ग अनेक वर्षांनतर मोकळा झाला आहे. या मार्गाने दुचाकी तर सोडा, पायदळ जाणेही कठीण झाले होते. तसेच येथील दोन्ही नेहरुमार्केटची दुकाने ही पूर्णपणे अतिक्रमण करून समोर आल्याने वाहतुकीला अडथडा ठरत आहे. आमचे जसे अतिक्रमण काढले तसेच सर्व मार्केटमधील अतिक्रमण काढा अशी मागणी फेरीवाल्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना केली आहे.तसेच सुधीर जाचक यांच्या नेतृत्वात फेरीवाल्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन अडचणी मांडल्या व त्यावर योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.आर्वीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. ते काढण्याकरिता तहसीलदार आणि प्रशासनाच्या ही सूचना आहे. हातगाडी व फुटपाथवर व्यवसाय करणाºया भाजी व फळ विक्रेत्यांना येथील इंदिरा चौकात पक्के ओटे बांधून जागा उपलब्ध करून दिली आहे. दहा बाय दहाची जागा फळ विक्रेत्यांना तर दहा बाय बाराची जागा भाजी विक्रेत्यांना दिली आहे. त्यांनी तेथे जाऊन व्यवसाय केल्यास अतिक्रमणाची समस्या काही प्रमाणात सुटेल.साकेत राऊत, अभियंता, नगरपालिका आर्वी

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका