शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

दोन दिवसांत साडेपाच हजार क्विंटल धान्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:00 AM

देशात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. अशा स्थितीत अन्नधान्याचा तुटवडा पडू नये. शेतकऱ्यांची आर्थिक परवड दूर व्हावी म्हणून सुरु झालेल्या नियोजनबद्ध धान्य विक्रीला शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्येही शेतकऱ्यांना आधार : सोशल डिस्टंन्सिंगचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सर्वत्र लॉकडाऊन असतानाही राज्यातील नामांकित हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक चांगलीच वाढली आहे. दोन दिवसात या बाजार समितीत १८० वाहनांच्या माध्यमातून तब्बल ५ हजार ७०० क्विंटल धान्याची आवक झाली आहे. शेतकऱ्यांच्या आरोग्याकरिता येथे निर्जंतुकीकरण व सोशल डिस्टन्सिगचेही काटेकोरपणे पालन केले जात आहे.देशात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. अशा स्थितीत अन्नधान्याचा तुटवडा पडू नये. शेतकऱ्यांची आर्थिक परवड दूर व्हावी म्हणून सुरु झालेल्या नियोजनबद्ध धान्य विक्रीला शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजारात बुधवारी ८२ वाहनांमधून १ हजार ८७५ क्विंटल तर शुक्रवारी ९८ वाहनांमधून ३ हजार ९०० क्विंटल धान्याची आवक झाली. गुरुवारी रामजन्मोत्सवानिमित्त धान्य बाजार बंद होता. धान्य बाजारातील गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळला जावा म्हणून शेतमालाची आवक मर्यादित करून दररोज १०० वाहनांना प्रवेश दिला जातो. शेतकऱ्यांना बाजार समितीत संपर्क साधून आपल्या शेतमालाची नोंदणी केल्यानंतर त्यांना मिळालेल्या तारखेवरच त्यांचा शेतमाल घेण्यात येत आहे.त्यानुसार प्रवेशद्वारावरच मास्क लावलेल्या शेतकऱ्यांचे सॅनिटेशन करुनच आत प्रवेश दिला जातो. वजन काट्यावर हमाल, मापारी यांची संख्या तीन ठेवली आहे. गर्दी होऊ नये म्हणून सुरक्षा रक्षक व कर्मचारी ठिक ठिकाणी नियुक्त केले आहे. कॅन्टीनमधील जेवण व्यवस्था पॉकेट मधून केली जात आहे. तसेच ध्वनिक्षेपकावरून सूचना देत हात धुण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच रोज सायंकाळी मार्केट यार्डचे निर्जंतुकीकरण करण्याची काळजी बाजार समिती व्यवस्थापनाकडून घेतली जात आहे.अद्याप २० टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच असल्याचा अंदाजकापसाच्या जिनिंग प्रेसिंग प्रकियेला शासनाने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे कापूस मार्केट बंद आहे. आतापर्यंत जवळपास ७ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. कापूस खरेदी उशिरा सुरु झाल्याने शेतकऱ्यांकडे आताही जवळपास २० टक्के म्हणजे २ लाख क्विंटल कापूस शिल्लक आहे, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे शासनाने या कालावधीतच कापसाचीही खरेदी तत्काळ सुरु करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे. धान्य बाजारात गर्दी मर्यादित करण्यासाठी गरजूंनी आपल्या मालाची नोंद समिती कार्यालयात करावी. त्यांनतर दिलेल्या तारखेवर शेतमाल विक्रीसाठी आणून शेतकऱ्यांनी आपल्या आरोग्य सुरक्षेची पुरेपुर काळजी घ्यावी.अ‍ॅड. सुधीर कोठारी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड