शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

अंगणवाडी कर्मचारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:50 PM

राज्य सरकारने ज्या अंगणवाडी केंद्रात कमीत कमी २५ मुले नाहीत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेत तसा आदेश निर्गमित केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोर ठिय्या : केंद्र बंद करण्याचा निर्णय मागे घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने ज्या अंगणवाडी केंद्रात कमीत कमी २५ मुले नाहीत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेत तसा आदेश निर्गमित केला आहे. सदर आदेश अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा ठपका ठेवत तो तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाकचेरीसमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व शालेय पोषण आहार देणाऱ्या महिलांना प्रतिदिवस ३५० रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय गटप्रवर्तकांना ४५० रुपये प्रतिदिवस मानधन देण्याचेही आश्वासन दिले होते. परंतु, या आश्वासनाची पूर्तता अद्यापही त्यांनी केली नाही. सदर आश्वासनाची पूर्तता तात्काळ करण्यात यावी, या मागणीसह विविध मागण्याही निवेदनातून करण्यात आला आहेत. शिवाय ज्या अंगणवाडी केंद्रात २५ पेक्षा कमी मुले नाहीत अशा अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणीही या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिवसभर असलेल्या ढगाळी वातावरणाची तमा न बाळगता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्धा जिल्हा आयटक अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्त्वात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा संघटक असलम पठान, विजया पावडे, मैना उईके, मंगला इंगोले, ज्ञानेश्वरी डंबारे, शोभा तिवारी यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चा