शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

अ. भा. साहित्य संमेलन भव्य झाले, दिव्य नाही; पैशाने सारे विकत घेता येत नाही

By नरेश डोंगरे | Updated: February 5, 2023 18:32 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगर ( वर्धा ) - तुम्हारा लहेजा बता रहा हैं, तूम्हारी दौलत नई नई हैं! ...

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगर (वर्धा) - तुम्हारा लहेजा बता रहा हैं, तूम्हारी दौलत नई नई हैं! हा दोन ओळीचा शेर खूप बोलका आहे. पैसे जवळ आले म्हणजे सारे आल बेल करुन घेता येत नाही.  बापू विनोबांच्या कर्मभूमी पार पडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनातून ते पुन्हा एकदा अधोरखित झाले. भक्कम आर्थिक पाठबळामुळे  संमेलन भव्य झाले. मात्र आयोजनातील विविध उणीवांमुळे या भव्यतेला दिव्यतेची झालर लागू शकली नाही.

वर्धेच्या रामनगर परिसरात २६ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात साहित्य नगरी निर्माण करण्यात आली होती. या नगरीला राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगर असे नाव देण्यात आले होते. साहित्य संमेलनाचे हे ९६ वे आयोजन भव्य दिव्य व्हावे यासाठी सरकारने आर्थिक नव्हे तर दुसरीही हरसंभव मदत आयोजकांना केली होती. तब्बल दोन कोटींचे अनुदान दिले. गडकरी मेघेंचे पाठबळ वेगळे होते. बाकीही काही वेगळे अर्थमार्ग आयोजकांना येऊन भेटले होते.

शीर्षस्थ नेत्यांनी शब्द टाकून कुमार विश्वास सारख्या लोकप्रीय विख्यात साहित्यिकाला या संमेलनात बोलवून घेत संमेलनाला वेगळी श्रीमंती जोडली होती. त्यामुळे साहित्य नगरीतील विनोबा भावे सभामंडप, राम शेवाळकर व्यासपीठ, मनोहर म्हैसाळकर सभामंडप, देविदास सोटे कवी कट्टा, सुरेश भट गझल कट्टा, lमावशी केळकर तसेच अन्य सभा मंडप अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार झाले होते. ग्रंथ आणि पुस्तक प्रदर्शनीचा परिसरही प्रशस्तच बनविण्यात आला होता. हे सारे काही भव्यपणे साकारले, त्यामुळे आपसुकच त्याला दिव्यतेची जोड मिळेल, असा आयोजकांचा होरा होता. त्यामुळे आयोजक ओव्हर कॉन्फिडंट झाले. त्यांनी प्रत्यक्ष संमेलनाच्या अंमलपूर्तीसाठी मनात येईल तशा पद्धतीने आयोजन समित्या तयार केल्या.क्षमता नसणाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आणि येथूनच  गडबड घोटाळा सुरू झाला. आयोजन सुरेख व्हावे याची काळजी न घेता 'अनेकांनी स्टाईल मे रहने का' फंडा अवलंबला. उणीवांकडे दुर्लक्ष करून खुशमस्करे पुढे पुढे करत प्रतिभावंतांना दुर्लक्षित करू लागल्यामुळे अनेक जण रुष्ट झाले. 

साहित्य नगरीला जायचे नाही,अशी भूमिका घेतली. अनेकांनी फोनोफ्रेंड करत एकमेकांना आपली भावनाही बोलून दाखवली. त्यांची अनुपस्थिती आणि व्यक्त केलेल्या भावना या संमेलना भोवती नाराजीच वलय निर्माण करणाऱ्या ठरल्या. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी करणारे मोठे पांढरे शुभ्र सभामंडप आणि त्यात मोठ्या प्रमाणात श्रोत्यांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवण्यात आल्या असल्या तरी श्रोत्यांनी त्या दुर्लक्षित केल्या. परिणामी बोलणारे, सांगणारे आणि ऐकवणारे मोठ्या संख्येत असले तरी ऐकणारे पाहिजे त्या प्रमाणात उपस्थित नसल्याने हे सभामंडप ओशाळल्यासारखे झाले. परिणामी साहित्य नगरी भव्य दिसत असली तरी तिला दिव्यत्वाची जोड मिळू शकली नाही. एकूणच पैशाने सारे विकत घेता येत नाही, याची प्रचिती या संमेलनात पुन्हा एकदा आयोजकांसह अनेकांना आली.

स्टॉलधारकही  दुर्लक्षित!

सारस्वतांच्या नगरीत जाऊन श्रीमंती पूजन करण्याचे अनेकांची योजना होती. त्यामुळे त्यांनी साहित्य नगरीत दोन हजारापासून पंधरा हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजली आणि आपल्या वेगवेगळ्या दुकानांसाठी स्टॉल विकत घेतले. मात्र आयोजकांनी  त्यांना कोणतीही चांगली सुविधा उपलब्ध करून दिली नाही. सम्मेलन सुरू होण्याच्या पूर्वसंधेपासून तो समारोपापासून ते दुर्लक्षितच राहिले. 

टॅग्स :wardha-acवर्धा