शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

आर्वीत कृत्रिम पाणीटंचाई; अख्ख्या कुटुंबाचीच धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 13:56 IST

टँकरद्वारे पाणीपुरवठा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण रामभरोसे

राजेश सोळंकी

आर्वी (वर्धा) : येथील सारंगपुरी जलाशयातून आर्वीकरांना नियमित पाणीपुरवठा केल्या जायचा. मात्र, नगरपालिकेने ही नळ योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हस्तांतरित केली. आता जीवन प्राधिकरणकडून शहराला पाणीपुरवठा होत असून पाणीपुरवठ्यात कधी बिघाड येईल हे सांगता येत नाही. जीवन प्राधिकरणच्या या रामभरोसे कामकाजामुळेच शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून भर उन्हात पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील वर्धा नदीवरून शहराला पाणीपुरवठा होतो. मागील दोन दिवसांपासून पांडुरंग वाॅर्ड, आसोलेनगर, जिजाऊनगर, देऊलकर लेआउट, संभाजीनगर आदी भागांत पाणीपुरवठा न झाल्याने अख्खे कुटुंबच पाण्यासाठी धडपडत आहे. विशेष म्हणजे नळाला पाणी आले नाही ही बाब महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता अजय गायधनी यांनाच माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जीवन प्राधिकरण कार्यालयात तांत्रिक कर्मचारी आणि रोजंदारी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. त्यांनी जलकुंभाला पाणी नसल्यासंदर्भात अधिकाऱ्यांना माहिती देणे आवश्यक होते. उपअभियंता अजय गायधनी यांच्यासोबतच अभियंता सूरज येनगडे यांनाही नागरिकांना पाणी मिळाले नसल्याची माहिती नव्हती. अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनीही गांभीर्य दाखविले नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

पाण्याची समस्या गंभीर, घराबाहेर ड्रमच्या रांगा

जीवन प्राधिकरणच्या दुर्लक्षामुळे शहरात पाण्याची समस्या गंभीर होत आहे. पालिकेकडून स्टेशन वॉर्ड, संजयनगर, वाल्मीक वॉर्ड आदी भागात टँकरद्वारे दररोज पाच फेऱ्या केल्या जातात. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांच्या घराबाहेर ड्रमच्या रांगा दिसून येतात. सध्या एकच टँकर धावत असून गरज पडल्यास नागरिक फोन करून पाण्याची मागणी करताना दिसून येत आहेत.

शहरात काय आहे व्यवस्था?

शहरात २३ वॉर्ड असून १३ हजार कुटुंबे राहतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साडेचार हजार नळ जोडण्या आहेत. पाणीपुरवठा करण्याकरिता दोन जलकुंभ असून जनतानगरातील जुना जलकुंभ तोडून नवीन बांधण्यात आला. तर दुसरा जलकुंभ एलआयसी कॉलनीत आहे. या दोन्ही जलकुंभांची क्षमता ९ लाख लिटर आहे. जाजूवाडी येथे आता नव्याने जलकुंभ तयार करण्यात आला असून १५ लाख लिटर साठवणूक क्षमता आहे. काही दिवसांपूर्वीच यातून पाण्याचे वितरण होत आहे.

आर्वी शहरातील काही वाॅर्डांत पाण्याची समस्या असल्याने नगरपंचायतच्या टँकरने पाणीपुरवठा केला जातो. दिवसभरात पाच ट्रिप होतात. जास्तच समस्या निर्माण झाली तर टँकरची त्या परीने व्यवस्था करण्यात येईल.

सुरेंद्र चोचमकर, अभियंता, न.प. आर्वी

देऊरवाडा येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जलकुंभात पाण्याची साठवणूक करता आली नाही. त्यामुळे आर्वी शहरातील जलकुंभात पाणी पोहोचले नसल्याने नळाला पाणी सोडण्यात आले नव्हते. आज जलकुंभ भरण्याचे काम सुरू आहे.

सूरज येंगडे, अभियंता जीवन प्राधिकरण, आर्वी

नळाला पाणी येत नसल्यास तांत्रिक बिघाड किंवा काही अडचणी असेल तर जीवन प्राधिकरणने नागरिकांना सूचना द्यायला हव्यात. जेणेकरून पाण्याचे नियोजन करून ठेवतील. नागरिकांना पाणी मिळाले नसल्याने अनेक वॉर्डांतील कुटुंबीयांची मोठी अडचण झाली.

- सुरेश मोटवानी, सामाजिक कार्यकर्ते, आर्वी

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातwardha-acवर्धा