शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत कृत्रिम पाणीटंचाई; अख्ख्या कुटुंबाचीच धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 13:56 IST

टँकरद्वारे पाणीपुरवठा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण रामभरोसे

राजेश सोळंकी

आर्वी (वर्धा) : येथील सारंगपुरी जलाशयातून आर्वीकरांना नियमित पाणीपुरवठा केल्या जायचा. मात्र, नगरपालिकेने ही नळ योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हस्तांतरित केली. आता जीवन प्राधिकरणकडून शहराला पाणीपुरवठा होत असून पाणीपुरवठ्यात कधी बिघाड येईल हे सांगता येत नाही. जीवन प्राधिकरणच्या या रामभरोसे कामकाजामुळेच शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून भर उन्हात पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील वर्धा नदीवरून शहराला पाणीपुरवठा होतो. मागील दोन दिवसांपासून पांडुरंग वाॅर्ड, आसोलेनगर, जिजाऊनगर, देऊलकर लेआउट, संभाजीनगर आदी भागांत पाणीपुरवठा न झाल्याने अख्खे कुटुंबच पाण्यासाठी धडपडत आहे. विशेष म्हणजे नळाला पाणी आले नाही ही बाब महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता अजय गायधनी यांनाच माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जीवन प्राधिकरण कार्यालयात तांत्रिक कर्मचारी आणि रोजंदारी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. त्यांनी जलकुंभाला पाणी नसल्यासंदर्भात अधिकाऱ्यांना माहिती देणे आवश्यक होते. उपअभियंता अजय गायधनी यांच्यासोबतच अभियंता सूरज येनगडे यांनाही नागरिकांना पाणी मिळाले नसल्याची माहिती नव्हती. अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनीही गांभीर्य दाखविले नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

पाण्याची समस्या गंभीर, घराबाहेर ड्रमच्या रांगा

जीवन प्राधिकरणच्या दुर्लक्षामुळे शहरात पाण्याची समस्या गंभीर होत आहे. पालिकेकडून स्टेशन वॉर्ड, संजयनगर, वाल्मीक वॉर्ड आदी भागात टँकरद्वारे दररोज पाच फेऱ्या केल्या जातात. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांच्या घराबाहेर ड्रमच्या रांगा दिसून येतात. सध्या एकच टँकर धावत असून गरज पडल्यास नागरिक फोन करून पाण्याची मागणी करताना दिसून येत आहेत.

शहरात काय आहे व्यवस्था?

शहरात २३ वॉर्ड असून १३ हजार कुटुंबे राहतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साडेचार हजार नळ जोडण्या आहेत. पाणीपुरवठा करण्याकरिता दोन जलकुंभ असून जनतानगरातील जुना जलकुंभ तोडून नवीन बांधण्यात आला. तर दुसरा जलकुंभ एलआयसी कॉलनीत आहे. या दोन्ही जलकुंभांची क्षमता ९ लाख लिटर आहे. जाजूवाडी येथे आता नव्याने जलकुंभ तयार करण्यात आला असून १५ लाख लिटर साठवणूक क्षमता आहे. काही दिवसांपूर्वीच यातून पाण्याचे वितरण होत आहे.

आर्वी शहरातील काही वाॅर्डांत पाण्याची समस्या असल्याने नगरपंचायतच्या टँकरने पाणीपुरवठा केला जातो. दिवसभरात पाच ट्रिप होतात. जास्तच समस्या निर्माण झाली तर टँकरची त्या परीने व्यवस्था करण्यात येईल.

सुरेंद्र चोचमकर, अभियंता, न.प. आर्वी

देऊरवाडा येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जलकुंभात पाण्याची साठवणूक करता आली नाही. त्यामुळे आर्वी शहरातील जलकुंभात पाणी पोहोचले नसल्याने नळाला पाणी सोडण्यात आले नव्हते. आज जलकुंभ भरण्याचे काम सुरू आहे.

सूरज येंगडे, अभियंता जीवन प्राधिकरण, आर्वी

नळाला पाणी येत नसल्यास तांत्रिक बिघाड किंवा काही अडचणी असेल तर जीवन प्राधिकरणने नागरिकांना सूचना द्यायला हव्यात. जेणेकरून पाण्याचे नियोजन करून ठेवतील. नागरिकांना पाणी मिळाले नसल्याने अनेक वॉर्डांतील कुटुंबीयांची मोठी अडचण झाली.

- सुरेश मोटवानी, सामाजिक कार्यकर्ते, आर्वी

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातwardha-acवर्धा