राज्य परिवहन महामंडळाची बस पुलावरुन नदीत पडता पडता वाचली; ५५ प्रवासी सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 21:27 IST2022-10-28T21:27:24+5:302022-10-28T21:27:52+5:30
Wardha News वर्धेवरून आर्वीला जाणारी परिवहन महामंडळाची बस सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील धाम नदीच्या पुलावरून खाली कोसळताना वाचली. सदर घटना शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता घडली.

राज्य परिवहन महामंडळाची बस पुलावरुन नदीत पडता पडता वाचली; ५५ प्रवासी सुरक्षित
वर्धा : वर्धेवरून आर्वीला जाणारी परिवहन महामंडळाची बस सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील धाम नदीच्या पुलावरून खाली कोसळताना वाचली. सदर घटना शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता घडली.
एम एच ४०/ ५२९७ क्रमांकाची आर्वी आगाराची जादा बस वर्धावरून सात वाजता निघाली मात्र येळाकेळी पुलाजवळ येतात चालक अचानक दचकला आणि बसवरील त्यांचे नियंत्रण सुटले त्यामुळे बस पुलाचा कठडे तोडून काही भाग पुलाखाली आली मात्र प्रसंगावधान राखून चालकाने बसवर पुन्हा नियंत्रण मिळविले.
बस जर खाली पडली असती तर अनेकांचे जीव गेले असते चालक अमोल भांगे यांच्या डोळ्याला मात्र मार लागला आहे एक प्रवासी किरकोळ जखमी आहे बसमधील ५५ ते ५७ प्रवासी होते या बसवर राहून इथापे वाहक होते.