शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

७३५ शेतकऱ्यांनी दिली ‘समृद्धी’करिता जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:00 AM

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकरी खातेदारांपैकी ७३५ शेतकरी खातेदारांकडून जमीन खरेदी खत व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे८६.८ टक्के क्षेत्राचे संपादन । ३५०.४२ कोटींवर मोबदला वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकरी खातेदारांपैकी ७३५ शेतकरी खातेदारांकडून जमीन खरेदी खत व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे. जिल्ह्यात ८६.८ टक्के क्षेत्र संपादनाचे काम पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना ३५०.४२ कोटी १७ लाख ७ हजार ९५ रुपयांचे वाटप मोबदल्याच्या रूपाने करण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा, सेलू, आर्वी तालुक्यातील शेतकरी समृद्ध झाला आहे.महाराष्ट्र समृद्धी महामार्गात सेलू तालुक्यातील ३९९, वर्धा तालुक्यातील २९२ व आर्वी तालुक्यात १८५ शेतकरी खातेदारांची जमीन घेण्यात आली आहे. सेलू तालुक्यात २५७.०६२, वर्धा तालुक्यात २०६.१७२ व आर्वी तालुक्यात ११६.२३ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. आतापर्यंत ७७३ शेतकऱ्यांकडून संमती मिळविण्यास शासनाला यश आले आहे. यामध्ये सेलू तालुक्यात संपूर्ण ३३९ शेतकºयांकडून जमीन घेण्यात आल्या. तर वर्धा तालुक्यात २९२ पैकी २७१ शेतकºयांकडून जमिनी घेण्यात आल्या.आर्वी तालुक्यात १८५ पैकी १६२ शेतकºयांकडून जमीन देण्याबाबत संमती मिळविण्यात आली. ७७३ शेतकºयांनी महामार्गाला जमीन देण्यास संमती दर्शविली असली तरी ७३५ शेतकºयांकडून खरेदी खत करून घेण्यात आले आहे. उर्वरित १४१ शेतकºयांकडून खरेदी खत करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सेलू तालुक्यात ६८, वर्धा तालुक्यात ५२ व आर्वी तालुक्यात २० शेतकरी खातेदारांचा समावेश आहे. शेतकºयांकडून जमिनी खरेदी करून सेलू तालुक्यात २२१.५८४६ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्यात आले आहे. वर्धा तालुक्यात १७५.६२२, आर्वी तालुक्यात १०१.६१ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ४९८.८१६६ हेक्टर क्षेत्र संपादीत केले आहे. उर्वरीत ८०.६४७४ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सेलू तालुक्यात खरेदी खत झालेल्या खातेदारांची टक्केवारी ८२.९५ टक्के असून वर्धा तालुक्यात ८१.८४ आर्वी तालुक्यातील ८९.१८ टक्के शेतकºयांकडून जमिनी महामार्गासाठी घेण्यात आल्या आहे. या शेतकºयांना ३५० कोटी ४२ लाख १७ हजार ७९५ रुपयाचे वाटप करण्यात आले आहे. समृद्धीबाबत संभ्रमावस्था असल्याने सुरुवातीला जमीन देण्यास शेतकºयांनी नकार दिला होता. मोबदल्यामुळे हा विरोध मावळल्याचे आता चित्र आहे.सर्वाधिक गावे सेलू तालुक्यातीलमहाराष्ट्र समृद्धी महामार्गात सेलू तालुक्यातून सर्वाधिक १६ गावातून जमीन अधिग्रहणाचे काम करण्यात आले. वर्धा तालुक्यातून १० तर आर्वी तालुक्यातून ८ गावातील शेतकºयांकडून जमिनी महामार्गासाठी घेण्यात आल्या. वर्धा तालुक्यातून २३.९०० कि़मी. सेलू तालुक्यातून २५.१६० तर आर्वी तालुक्यातून ११.६७० कि़मी.तून हा समृद्धी महामार्ग जाणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग