शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

६२८ बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:39 IST

आरोग्यासंदर्भात राज्याला मार्गदर्शक ठरणाºया वर्धा जिल्ह्यात कुपोषित बालके आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देमहिला बाल कल्याण विभागाचे सर्वेक्षण

आॅनलाईन लोकमतवर्धा : आरोग्यासंदर्भात राज्याला मार्गदर्शक ठरणाºया वर्धा जिल्ह्यात कुपोषित बालके आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील अंगणवाडी व मिनी अंगणवाडीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह कुपोषण निर्मूलनासाठी काम करणाºया यंत्रणांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्धेसारख्या प्रगत जिल्ह्यात कुपोषण नसावे, असा अनेकांचा समज असताना तब्बल ६२८ बालके तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत आढळून आले.महिला व बाल कल्याण विभागाने जिल्ह्यातील १,२८१ अंगणवाडी व १८७ मिनी अंगणवाडीत सर्वेक्षण एका अभियानाच्या माध्यमातून केले. यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या ४८२, तीव्र कुपोषित बालकांची संख्या १४६ असल्याचे दिसून आले आहे. २०१६ च्या तुलनेत वर्धा जिल्ह्यातील कुपोषणाची ही आकडेवारी कमी असल्याचा दावा यंत्रणांनी केला असला तरी महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग यांच्या कुपोषण निर्मूलनाच्या कार्यावर या आकडेवारीने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.डिसेंबर २०१६ पर्यंत मध्यम कुपोषित बालकांची संख्या ८५४ तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या १९७ होती. वर्धा जिल्ह्यात ज्या गावांमध्ये कुपोषणाची संख्या तीव्र आहे अशा ठिकाणी बाल ग्रामविकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ज्या गावात साधारणत: दोन पेक्षा अधिक बालके कुपोषित आढळून आले त्यांना तत्काळ ग्रामविकास केंद्रात भर्ती करण्यात आले व ३० दिवस तेथे त्यांच्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे संबंधीत विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरी वर्धेत या योजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.पूर्वशालेय कुपोषित बालकांकरिता पूरक आहारआजची लहान मुलं या देशाचे भविष्य घडविणारे आहेत, यांच्या विकासाचा पाया मजबूत रहावा याबाबतची महत्वाची जबाबदारी प्रत्येकावर आहे. पुर्वशालेय वयोगटातील बालकांचे वय हे त्यांच्यामध्ये शारीरिक, शैक्षणिक आणि सामाजिक बदल घडविणारे वय आहे. या वयामध्ये योग्य प्रतीचे आणि योग्य प्रमाणात पोषक आणि पुरक आहार सर्वोतोपरी आवश्यक मुलभूत गरज आहे. याकरिताच जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने अशांना ‘पुर्वशालेय कुपोषित बालकांचे पूरक आहार व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येत आहे.कुपोषित बालकांसाठी व्हीसीडीसी सेंटरवाढत असलेल्या कुपोषणावर आळा बसविण्याकरिता शासनाच्यावतीने नव्याने व्हीसीडीसी सेंटर (बाल उपचार केंद्र) सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रात तीव्र कुपोषित असलेल्या बालकांवर औषधोपचार करून त्यांना पोषण आहार देण्यात येणार आहे. कुपोषित बालके आढळलेल्या अंगणवाडीच्या परिसरात असे सेंटर सुरू होणार आहे. ही योजना केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणार असून कुपोषित बालकांना पोषण आहार देण्यासह त्यांच्या पालकांना समुपदेशन करण्याची जबाबदारी अंगणवाडी आणि आशा सेविकांवर देण्यात आली आहे. जिल्ह्यात लवकरच असे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात वर्षाकाठी करण्यात आलेल्या सर्व्हेत कुपोषित बालके आढळून आली आहे. हा आकडा गत वर्षीच्या तुलनेत कमी आहे. असे असले तरी यावर प्रतिबंध लावण्याकरिता शासनाच्यावतीने व्हीसीडीसी केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्रात कुपोषित बालकांच्या पोषण आहारावर भर देण्यात येणार आहे.- विवेक इलमे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य) तथा प्रभारी अधिकारी महिला बालकल्याण जि.प. वर्धा.