शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

पाणंद रस्त्यासाठी ५ हजार २४७ किमीचे प्रस्ताव, मंजुरी केवळ ५५४ किमीलाच ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 18:26 IST

रोजगार हमी योजनेला नियमांचा खोडा : केवळ ९३ कामे सुरू, अडचणी सुटता सुटेना

चेतन बेलेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या अडचणी लक्षात घेता मातोश्री पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या वतीने पाणंद रस्त्यांसाठी ५ हजार ५४७ किमीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले. यापैकी केवळ ७५८ किमीच्या रस्त्यांना प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली.

रोजगार हमी योजनेतून ही कामे करण्यात येत असली, तरी या कामांना नियमाचा खोडा लागल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी सुटता सुटत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागात शेती मुख्य व्यवसाय असून, अनेकांनी पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ लागल्या. त्यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पाणंद रस्ते मोहीम हाती घेतली. प्रशासनाचे सहकार्य आणि लोकसहभागातून सुरू केलेल्या या चळवळीची दखल घेत राज्य शासनाने पालकमंत्री पाणंद रस्ते योजना सुरू केली होती.

या योजनेत राज्य सरकारने सुधारणा करुन राज्यात मातोश्री ग्राम पांदन रस्ते योजना सुरू केली. 'मी समृद्ध, तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध, तर माझा महाराष्ट्र समृद्ध' ही संकल्पना मनरेगा व राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ग्रामपंचयातीला प्रस्ताव मागविण्यात आले. जिल्हाभरातून ५५३ ग्रामंपचायतींकडून पाच हजार २४७ किमीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. यापैकी २५ जानेवारी २०२२ ते २९ जानेवारी २०२४ दरम्यान सादर झालेल्या १६ याद्यांमध्ये ५५४ रस्त्याच्या ७५८ किमीच्या कामाला मंजुरी देण्यात आली. २४ कामे रद्द करण्यात आली असून, ४८९ कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ४१ पाणंद रस्ते तात्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा परिषदेसमोर ठेवण्यात आले आहेत. मंजूर झालेल्या रस्त्यांपैकी देवळी वगळता इतर सर्व तालुक्यांत ९३ कामे सुरू असल्याची माहिती मनरेगा विभागाकाडून देण्यात आली आहे.

सुरु असलेली कामेआर्वी - ३३आष्टी - १४देवळी - ०९हिंगणघाट - 00कारंजा - ०७समुद्रपूर - ०६सेलू - ०५वर्धा - १९

रोहयोच्या कामासाठी मजूरही मिळेनामंजूर प्रस्तावाचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीला सांगण्यात आले. खोदकामाचा समावेश असल्याने किमान २० मजुरांची आवश्यकता आहे; मात्र खोदकामासाठी २० मजूरही मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अकुशल कामांना योजनेत प्राधान्य कमी असल्याने ही कामे थांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

२४ पाणंद रस्त्यांची कामे रद्दमंजूर पांदन रस्त्यांपैकी २४ कामे रद्द करण्यात आली आहेत. यात हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील ९ पांदन रस्त्यांची कामे बांधकाम विभागाकडे वळती करण्यात आल्याने रद्द करण्यात आली, तर वर्धा तालुक्यातील तळेगाव ग्रामंपचा- यतीचे एक काम शासनस्तरावरून, तर एक कामाचे डबल लोकेशन आल्याने रद्द करण्यात आले आहे. तर सेलू, आणि कारंजा तालुक्यातील पांदन रस्त्याचे डांबरीकरण, लोकेशन डबर दाखविण्यात आल्याने, तसेच वनविभागात रस्ते येत असल्याने १३ कामे रद्द करण्यात आली आहे.

तालुकानिहा प्रस्तावतालुका             ग्रामपंचायत          प्रस्ताव           मंजुरीआर्वी                     ७२                       ३१८                 ७७आष्टी                     ४१                        १७८                ७०देवळी                    ६३                       २६०                ८७हिंगणघाट               ७८                       २८९                ७६कारंजा                   ३१                        १५०                ३७समुद्रपूर                 ७७                       ५४६                ५८ सेलू                       ९९                        ५०३                ५४वर्धा                       ९२                         ५७०               ७१

"रोजगार हमी योजनेत कुशल कामांना प्राधान्य देण्यात येते. यात फळबाग लागवड, इतर कामांचा समावेश आहे. पाणंद रस्त्यांच्या कामासाठी मजुरांचा अभाव असल्याने बहुतेक कामे मशिनद्वारे करावी लागतात. त्यामुळे मंजुरी देताना मर्यादा येते. सध्या ७५८ किमी रस्त्यांना मंजुरी दिली असून ९३ रस्त्यांची कामे सुरू आहेत."- श्रीपती मोरे, उपजिल्हाधिकारी, रोहयो, वर्धा, 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाwardha-acवर्धा