शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पाणंद रस्त्यासाठी ५ हजार २४७ किमीचे प्रस्ताव, मंजुरी केवळ ५५४ किमीलाच ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 18:26 IST

रोजगार हमी योजनेला नियमांचा खोडा : केवळ ९३ कामे सुरू, अडचणी सुटता सुटेना

चेतन बेलेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या अडचणी लक्षात घेता मातोश्री पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या वतीने पाणंद रस्त्यांसाठी ५ हजार ५४७ किमीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले. यापैकी केवळ ७५८ किमीच्या रस्त्यांना प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली.

रोजगार हमी योजनेतून ही कामे करण्यात येत असली, तरी या कामांना नियमाचा खोडा लागल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी सुटता सुटत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागात शेती मुख्य व्यवसाय असून, अनेकांनी पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ लागल्या. त्यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पाणंद रस्ते मोहीम हाती घेतली. प्रशासनाचे सहकार्य आणि लोकसहभागातून सुरू केलेल्या या चळवळीची दखल घेत राज्य शासनाने पालकमंत्री पाणंद रस्ते योजना सुरू केली होती.

या योजनेत राज्य सरकारने सुधारणा करुन राज्यात मातोश्री ग्राम पांदन रस्ते योजना सुरू केली. 'मी समृद्ध, तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध, तर माझा महाराष्ट्र समृद्ध' ही संकल्पना मनरेगा व राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ग्रामपंचयातीला प्रस्ताव मागविण्यात आले. जिल्हाभरातून ५५३ ग्रामंपचायतींकडून पाच हजार २४७ किमीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. यापैकी २५ जानेवारी २०२२ ते २९ जानेवारी २०२४ दरम्यान सादर झालेल्या १६ याद्यांमध्ये ५५४ रस्त्याच्या ७५८ किमीच्या कामाला मंजुरी देण्यात आली. २४ कामे रद्द करण्यात आली असून, ४८९ कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ४१ पाणंद रस्ते तात्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा परिषदेसमोर ठेवण्यात आले आहेत. मंजूर झालेल्या रस्त्यांपैकी देवळी वगळता इतर सर्व तालुक्यांत ९३ कामे सुरू असल्याची माहिती मनरेगा विभागाकाडून देण्यात आली आहे.

सुरु असलेली कामेआर्वी - ३३आष्टी - १४देवळी - ०९हिंगणघाट - 00कारंजा - ०७समुद्रपूर - ०६सेलू - ०५वर्धा - १९

रोहयोच्या कामासाठी मजूरही मिळेनामंजूर प्रस्तावाचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीला सांगण्यात आले. खोदकामाचा समावेश असल्याने किमान २० मजुरांची आवश्यकता आहे; मात्र खोदकामासाठी २० मजूरही मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अकुशल कामांना योजनेत प्राधान्य कमी असल्याने ही कामे थांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

२४ पाणंद रस्त्यांची कामे रद्दमंजूर पांदन रस्त्यांपैकी २४ कामे रद्द करण्यात आली आहेत. यात हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील ९ पांदन रस्त्यांची कामे बांधकाम विभागाकडे वळती करण्यात आल्याने रद्द करण्यात आली, तर वर्धा तालुक्यातील तळेगाव ग्रामंपचा- यतीचे एक काम शासनस्तरावरून, तर एक कामाचे डबल लोकेशन आल्याने रद्द करण्यात आले आहे. तर सेलू, आणि कारंजा तालुक्यातील पांदन रस्त्याचे डांबरीकरण, लोकेशन डबर दाखविण्यात आल्याने, तसेच वनविभागात रस्ते येत असल्याने १३ कामे रद्द करण्यात आली आहे.

तालुकानिहा प्रस्तावतालुका             ग्रामपंचायत          प्रस्ताव           मंजुरीआर्वी                     ७२                       ३१८                 ७७आष्टी                     ४१                        १७८                ७०देवळी                    ६३                       २६०                ८७हिंगणघाट               ७८                       २८९                ७६कारंजा                   ३१                        १५०                ३७समुद्रपूर                 ७७                       ५४६                ५८ सेलू                       ९९                        ५०३                ५४वर्धा                       ९२                         ५७०               ७१

"रोजगार हमी योजनेत कुशल कामांना प्राधान्य देण्यात येते. यात फळबाग लागवड, इतर कामांचा समावेश आहे. पाणंद रस्त्यांच्या कामासाठी मजुरांचा अभाव असल्याने बहुतेक कामे मशिनद्वारे करावी लागतात. त्यामुळे मंजुरी देताना मर्यादा येते. सध्या ७५८ किमी रस्त्यांना मंजुरी दिली असून ९३ रस्त्यांची कामे सुरू आहेत."- श्रीपती मोरे, उपजिल्हाधिकारी, रोहयो, वर्धा, 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाwardha-acवर्धा