शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

पाणंद रस्त्यासाठी ५ हजार २४७ किमीचे प्रस्ताव, मंजुरी केवळ ५५४ किमीलाच ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 18:26 IST

रोजगार हमी योजनेला नियमांचा खोडा : केवळ ९३ कामे सुरू, अडचणी सुटता सुटेना

चेतन बेलेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या अडचणी लक्षात घेता मातोश्री पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या वतीने पाणंद रस्त्यांसाठी ५ हजार ५४७ किमीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले. यापैकी केवळ ७५८ किमीच्या रस्त्यांना प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली.

रोजगार हमी योजनेतून ही कामे करण्यात येत असली, तरी या कामांना नियमाचा खोडा लागल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी सुटता सुटत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागात शेती मुख्य व्यवसाय असून, अनेकांनी पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ लागल्या. त्यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पाणंद रस्ते मोहीम हाती घेतली. प्रशासनाचे सहकार्य आणि लोकसहभागातून सुरू केलेल्या या चळवळीची दखल घेत राज्य शासनाने पालकमंत्री पाणंद रस्ते योजना सुरू केली होती.

या योजनेत राज्य सरकारने सुधारणा करुन राज्यात मातोश्री ग्राम पांदन रस्ते योजना सुरू केली. 'मी समृद्ध, तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध, तर माझा महाराष्ट्र समृद्ध' ही संकल्पना मनरेगा व राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ग्रामपंचयातीला प्रस्ताव मागविण्यात आले. जिल्हाभरातून ५५३ ग्रामंपचायतींकडून पाच हजार २४७ किमीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. यापैकी २५ जानेवारी २०२२ ते २९ जानेवारी २०२४ दरम्यान सादर झालेल्या १६ याद्यांमध्ये ५५४ रस्त्याच्या ७५८ किमीच्या कामाला मंजुरी देण्यात आली. २४ कामे रद्द करण्यात आली असून, ४८९ कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ४१ पाणंद रस्ते तात्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा परिषदेसमोर ठेवण्यात आले आहेत. मंजूर झालेल्या रस्त्यांपैकी देवळी वगळता इतर सर्व तालुक्यांत ९३ कामे सुरू असल्याची माहिती मनरेगा विभागाकाडून देण्यात आली आहे.

सुरु असलेली कामेआर्वी - ३३आष्टी - १४देवळी - ०९हिंगणघाट - 00कारंजा - ०७समुद्रपूर - ०६सेलू - ०५वर्धा - १९

रोहयोच्या कामासाठी मजूरही मिळेनामंजूर प्रस्तावाचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीला सांगण्यात आले. खोदकामाचा समावेश असल्याने किमान २० मजुरांची आवश्यकता आहे; मात्र खोदकामासाठी २० मजूरही मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अकुशल कामांना योजनेत प्राधान्य कमी असल्याने ही कामे थांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

२४ पाणंद रस्त्यांची कामे रद्दमंजूर पांदन रस्त्यांपैकी २४ कामे रद्द करण्यात आली आहेत. यात हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील ९ पांदन रस्त्यांची कामे बांधकाम विभागाकडे वळती करण्यात आल्याने रद्द करण्यात आली, तर वर्धा तालुक्यातील तळेगाव ग्रामंपचा- यतीचे एक काम शासनस्तरावरून, तर एक कामाचे डबल लोकेशन आल्याने रद्द करण्यात आले आहे. तर सेलू, आणि कारंजा तालुक्यातील पांदन रस्त्याचे डांबरीकरण, लोकेशन डबर दाखविण्यात आल्याने, तसेच वनविभागात रस्ते येत असल्याने १३ कामे रद्द करण्यात आली आहे.

तालुकानिहा प्रस्तावतालुका             ग्रामपंचायत          प्रस्ताव           मंजुरीआर्वी                     ७२                       ३१८                 ७७आष्टी                     ४१                        १७८                ७०देवळी                    ६३                       २६०                ८७हिंगणघाट               ७८                       २८९                ७६कारंजा                   ३१                        १५०                ३७समुद्रपूर                 ७७                       ५४६                ५८ सेलू                       ९९                        ५०३                ५४वर्धा                       ९२                         ५७०               ७१

"रोजगार हमी योजनेत कुशल कामांना प्राधान्य देण्यात येते. यात फळबाग लागवड, इतर कामांचा समावेश आहे. पाणंद रस्त्यांच्या कामासाठी मजुरांचा अभाव असल्याने बहुतेक कामे मशिनद्वारे करावी लागतात. त्यामुळे मंजुरी देताना मर्यादा येते. सध्या ७५८ किमी रस्त्यांना मंजुरी दिली असून ९३ रस्त्यांची कामे सुरू आहेत."- श्रीपती मोरे, उपजिल्हाधिकारी, रोहयो, वर्धा, 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाwardha-acवर्धा