शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

४.३५ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

By admin | Updated: June 12, 2016 01:50 IST

सुगंधंीत तंबाखावर शासनाकडून बंदी असताना त्याचा साठा करून वाहतूक करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.

सरुळ शिवारात कारवाई : स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाहीवर्धा : सुगंधंीत तंबाखावर शासनाकडून बंदी असताना त्याचा साठा करून वाहतूक करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचा सुगंधीत तंबाखू, गुटखा आणि पान मटेरीयलचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कार्यवाही शनिवारी सायंकाळी वर्धा-राळेगाव मार्गावरील सरूळ या गावाजवळ करण्यात आली. हा सुगंधीत तंबाखू नागपूर येथून राळेगाव येथे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नसल्याने त्यांनी वाहन पकडल्यानंतर अन्न सुरक्षा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता गुटखा व त्याची वाहतूक करणाऱ्यांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणाची पुढील कारवाई अन्न सुरक्षा प्रशासनाचे अधिकारी करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या संदर्भात सदर विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता चौकशी सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या प्रकरणी वाहन चालक महेश धुर्वे रा. सुकळी (बाई) ता. सेलू जि. वर्धा याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम ५९ अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.पोलीस सुत्रानुसार, एम एच ४४ एम ४४७५ क्रमांकाचा ट्रक नागपूर येथून राळेगाव येथे मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखू घेवून जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच माहितीत असलेले घटनास्थळ गाठून सदर वाहन अडवून त्याची झडती घेतली. यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखू असल्याचे निष्पन्न झाले. वाहनात तंबाखू असल्याचे माहीत होताच त्यांनी ही माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची दिली. माहिती मिळताच विभागाचे ललित सोयाम, आर. बी. धाबर्डे व नारायण उईके यांनी घटनास्थळ गाठत पाहणी करून जप्त केलेला तंबाखू व त्याची वाहतूक करणाऱ्यांना ताब्यात घेतले. या वाहनात केवळ चालक असून त्याच्यावर अन्न सुरक्षा कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कडू, आचल मलकापूरे, मनोज चांदूरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)