शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

४.२८ लाख हेक्टरवर होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:30 PM

जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असले तरी मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. काही शेतकऱ्यांकडून धूळ पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, जोवर कमीत कमी १०० मिमी पाऊस पडत नाही तोवर शेतकऱ्यांनीही पेरणी करू नये.

ठळक मुद्दे१०० मि.मी. पावसानंतरच पेरणी करा : कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असले तरी मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. काही शेतकऱ्यांकडून धूळ पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, जोवर कमीत कमी १०० मिमी पाऊस पडत नाही तोवर शेतकऱ्यांनीही पेरणी करू नये. अल्प पावसानंतर पेरणी झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.यंदा खरीब हंगामात एकूण ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. खरीप ज्वारी १ हजार १०० हेक्टर, ६५ हजार हेक्टरवर तूर, ४०० हेक्टरवर मुंग, ७०० हेक्टरवर उडीद, ६७५ हेक्टरवर खरीप भुईमुंग, १ लाख २५ हजार ९२५ हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर कापूस या पिकाची लागवड होणार आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे. शिवाय ज्या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीला मुबलक पाणी आहे अशाच शेतकऱ्यांकडून सध्या धूळ पेरणीला गती दिली जात आहे. तळेगाव (टा.), सेलू परिसरात सध्या धूळ पेरणी केल्या जात असल्याचे दिसून येते. मात्र, पावसाने दगा दिल्यास याही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर खत आणि बियाण्यांची खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्ष राहूनच व्यवहार करावा, असेही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.बियाण्यांसाठी पैशाची जुळवाजुळवमागील दोन वर्ष निसर्गाने दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या उसनवारी आणि घरच्या लक्ष्मीचे सोन्याचे दागिणे गहाण ठेऊन बियाणे खरेदी करण्याच्या कामाला काही शेतकरी प्राधान्य देत आहे. अशातच दुबार पेरणीचा फटका अनेकांना न सहन करणाराच ठरणार असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.पीक कर्ज प्रस्ताव धूळ खातवेळीच पीक कर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खतांची खरेदी सहज करता येणार आहे. परंतु, काही बँकांमध्ये अनेक पीक कर्जचे प्रस्ताव धूळ खात असल्याचे दिसून येते. तर २४ जुलैपर्यंत पीक विमासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे याचाही लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.६ लाख ३९ हजार १४३ गाठी कापूस गाठींचे होणार उत्पन्न२ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापूस या पिकाची लागवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतकेच नव्हे तर नैसर्गिक आपत्ती न येता शेतकऱ्यांवर निसर्ग मेहरबान राहिल्यास एकूण ६ लाख ३९ हजार १४३ गाठी कापसाचे उत्पन्न होण्याची शक्यता कृषी विभागाच्या तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.८.९६ लाख क्विंटल उत्पादन होण्याची शक्यतायंदाच्या वर्षी खरीप हंगामात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. निसर्गाने साथ दिल्यास यंदा हंगामाच्या शेवटी एकूण ८ लाख ९६ हजार ९७८ क्विंटल उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.येत्या काही दिवसात दमदार पाऊस आल्यावर शेतकरी पेरणीच्या कामाला वेग देणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी शेती करतानाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन दक्षच राहिले पाहिजे. शिवाय दुबार पेरणीला सामोरे जावे लागू नये म्हणून कमीत कमी १०० मिमी पाऊस झाल्या शिवाय पेरणी करू नये.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती