शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

३६ तलाव गाळमुक्त करण्याचा उचलला विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 11:57 PM

‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ ही योजना सन २०१६-१७ मध्ये शासनाने हाती घेतली. पहिल्या वर्षी बोटावर मोजण्याइतकीच कामे जिल्हा प्रशासनाने हाती घेतली होती. तर यंदा तिसऱ्याही वर्षी हे अभियान वर्धा जिल्ह्यात राबविण्याचे निश्चित करून एकूण ३६ तलाव गाळमुक्त करण्याचा विडा जि.प.च्या लघु पाटबंधारे विभागाने उचलला आहे.

ठळक मुद्दे‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियान । एप्रिलमध्ये होणार प्रत्यक्ष कामाला सुरुवात

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ ही योजना सन २०१६-१७ मध्ये शासनाने हाती घेतली. पहिल्या वर्षी बोटावर मोजण्याइतकीच कामे जिल्हा प्रशासनाने हाती घेतली होती. तर यंदा तिसऱ्याही वर्षी हे अभियान वर्धा जिल्ह्यात राबविण्याचे निश्चित करून एकूण ३६ तलाव गाळमुक्त करण्याचा विडा जि.प.च्या लघु पाटबंधारे विभागाने उचलला आहे. या कामांची सुरूवात एप्रिल महिन्यात होणार आहे.गतवर्षी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या अभियानाच्या माध्यमातून ४९ कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी ३४ कामे पूर्ण करण्यात आली. त्यावेळी तलाव व धरणांमधून ३ लाख ७३ हजार ८८० घ.मी. गाळ निघेल असे अपेक्षित होते. प्रत्यक्ष कामादरम्यान ३,०६,६२० घ.मी. गाळ काढण्यात आला. त्यावेळी लोकसहभागातून १,९३,२६० घ.मी. गाळ काढण्यात आला होता. तर यंदाच्या वर्षी हिंगणघाट तालुक्यातील सावली येथील गाव तलाव, धामणगाव येथील तलाव, सेलू (मुरपाड) येथील तलाव, आर्वी (छोटी) येथील साठवण तलाव, भिवापूर येथील साठवण तलाव, चिकमोह येथील गाव तलाव, उमरी (येंडे) येथील पाझर तलाव, कानगाव येथील साठवण तलाव, भय्यापूर येथील साठवण तलाव, समुद्रपूर तालुक्यातील साखरा येथील गाव तलाव, पिंपळगाव येथील गाव तलाव, पिंपरी येथील साठवण तलाव, गिरड १ येथील साठवण तलाव, गिरड २ येथील साठवण तलाव, कानकाटी येथील गाव तलाव, समुद्रपूर येथील गाव तलाव, नंदोरी येथील तलाव, मंगरुळ येथील पाझर तलाव, देवळी तालुक्यातील कोळोणा (चोरे) येथील गाव तलाव, गौळ येथील पाझर तलाव, कोल्हापूर (राव) येथील पाझर तलाव, आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील तलाव, तळेगाव (श्या.पं.) येथील पाझर तलाव, इंदरमारी येथील साठवण तलाव, आर्वी तालुक्यातील आजनगाव येथील पाझर तलाव, सालदरा येथील पाझर तलाव, पांजरा (बो.) येथील पाझर तलाव, काकडदरा येथील तलाव, गौरखेडा येथील तलाव तर कारंजा (घा.) तालुक्यातील आजनादेवी येथील तलाव, ठाणेगाव येथील तलाव, पिंपरी येथील तलाव, आगरगाव येथील पाझर तलाव, बांगडापूर येथील गाव तलाव, बेलगाव येथील तलाव व सुसुंद्रा येथील तलाव गाळमुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.२ लाख ८७ हजार ८९० घ.मी. गाळ काढणारजिल्ह्यातील कारंजा (घा.), आर्वी, आष्टी, देवळी, समुद्रपूर, हिंगणघाट या तालुक्यातील एकूण ३६ तलाव गाळमुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या ३६ तलावांमधून सुमारे २ लाख ८७ हजार ८९० घ.मी. गाळ काढण्यात येणार आहे. त्यासाठी जेसीबी आणि पोकलॅन्ड आदी यंत्रांना लागणाऱ्या इंधनासाठी ३४ लाख ३१ हजार ६४८.८० रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. हे ३६ तलाव गाळमुक्त आणि शेतकऱ्यांनीही हा गाळ आपल्या शेतात टाकून शेतजमिनीची पोत वाढवावी यासाठी जि.प.चा लघु पाटबंधारे विभाग हे अभियान केवळ शासकीय न राहता ती एक लोकचळवळ व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.मागीलवर्षी १५ कामे झाली रद्दशेतकºयांनी उत्साह न दाखविल्याने मागील वर्षी ४९ कामांपैकी १५ कामे रद्द करण्यात आली होती. त्यावेळी ११ लाख ५६ हजार ५८ रुपयांचा निधी खर्च करून शासकीय यंत्रणेने १ लाख १३ हजार ३६० घ.मी. गाळ तलावांमधून काढला होता. शिवाय, अनेक शेतकºयांना हा गाळ शेतात टाकण्यासाठी देण्यात आला होता.गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार हे अभियान यंदा तिसºया वर्षीही जिल्ह्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मागील वर्षी या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदा ३६ तलाव गाळमुक्त करण्याचे आम्ही निश्चित केले आहे. यंदाच्या वर्षीच्या कामांना एप्रिल महिन्यात सुरुवात होणार आहे.- हेमंत गहलोत, जिल्हा जलसंधारण अधिकारी, जि.प. लघु पाटबंधारे विभाग, वर्धा.

टॅग्स :WaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प