शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

३५ प्रकल्पात नाममात्र जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 23:46 IST

यंदा प्रारंभी समाधानकारक पाऊस येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण नागरिकांसह हवामान खात्याचे भाकित पावसाने फोल ठरविले आहे.

ठळक मुद्देअत्यल्प पाऊस : मोठ्या व मध्यम जलाशयात ३३.३१ टक्के पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा प्रारंभी समाधानकारक पाऊस येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण नागरिकांसह हवामान खात्याचे भाकित पावसाने फोल ठरविले आहे. अद्याप जिल्ह्यातील जलाशयांमध्ये नाममात्र जलसाठाच आहे. जिल्ह्यात १५ मोठ्या व मध्यम जलाशयात ३३.३१ टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये २३ टक्केच पाणीसाठी असल्याची नोंद घेण्यात आली आहे.यावर्षी मान्सून वेळेवर सक्रिय होऊन समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आला होता; पण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, शेतकºयांसह सामान्यांची चिंता वाढली आहे. हीच स्थिती पूढेही कायम राहिल्यास जिल्ह्याला कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. यंदा सुरूवातीला निसर्गाच्या लहरीपणाचा जिल्ह्यातील शेतकºयांना फटका बसला. बहुतांश शेतकºयांनी दुबार पेरणी केली. वेळोवेळी झालेला पाऊस पेरणीयोग्य राहिल्याने शेतकºयांनीही पेरणीची कामे पूर्ण केली आहे. शेतकºयांनाही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अद्याप नदी-नाले दुथडी भरून वाहतील, असा पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु जलाशयांतील पाणी पातळीतही वाढ झालेली नाही. मागील वर्षी याच कालावधीत बहुतांश जलाशये १०० टक्के भरली होती.सध्या बोर प्रकल्पात १९.२८ टक्के, धाम प्रकल्पात २६.९५ टक्के, पोथरा ४३.३५ टक्के, पंचधारा ४४.२३, डोंगरगाव ३३.११ टक्के, मदन प्रकल्प ४४.३२ टक्के, मदन उन्नई धरण १७.७८ टक्के, लाल नाला प्रकल्प १७.४२ टक्के, नांद प्रकल्पात ३४.१४ टक्के, वडगाव प्रकल्पात ४१.१७ टक्के, उर्ध्व वर्धा धरण ४१.८६ टक्के, वर्धा कार नदी प्रकल्प १५.७९ टक्के, निम्न वर्धा २४.२८ टक्के तर बेंबळा प्रकल्पात २८.२७ टक्के जलसाठा आहे.लघु प्रकल्पांतील सुकळी २८.८२ टक्के, कवाडी ४०.१४ टक्के, सावंगी १५.४४ टक्के, लहादेवी ३६.३० टक्के, पारगोठाण ८.४८ टक्के, अंबाझरी २९.७९ टक्के, पांजरा बोथली १५.५९ टक्के, उमरी २७.०७ टक्के, टेंबरी ९.४३ टक्के, आंजी-बोरखेडी ३३.८२ टक्के, दहेगाव (गोंडी) ४७.६२ टक्के, कुºहा २४.१५ टक्के, रोठा एक २०.८९ टक्के, रोठा दोन २१.५ टक्के, आष्टी ७.७४ टक्के, पिलापूर १४.२५ टक्के, कन्नमवारग्राम १०.३५ टक्के, मलकापूर ३.२६ टक्के, परसोडी १२.८ टक्के, हराशी ३०.९४ टक्के तर टाकळी-बोरखेडी तलावामध्ये २०.१० टक्केच जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यातील जलाशये तुडूंब भरली होती. तलावही ओव्हर फ्लो झाले होते; पण यंदा ५० टक्केही साठा झाला नाही. काही दिवस पाऊस न आल्यास भविष्यात पाणीटंचाईची शक्यता वर्तविली जात आहे.मागील वर्षी २० जलाशयात होता ५८.२५ टक्के साठामागील वर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील २० लघु जलाशयात ५८.२५ टक्के पाणीसाठा होता. यंदा हा आकडा दमदार पाऊस न झाल्याने २३ टक्क्यांवर स्थिरावला आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील १५ मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये ४७.२६ टक्के जलसाठा होता. त्यावेळी आष्टी तालुक्यातील पिलापूर तलाव १०० टक्के, मलकापूर जलाशय ९९.९ टक्के तर आर्वी तालुक्यातील कवाडी तलाव ९०.५८ टक्के भरला होता.