शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

३५ प्रकल्पात नाममात्र जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 23:46 IST

यंदा प्रारंभी समाधानकारक पाऊस येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण नागरिकांसह हवामान खात्याचे भाकित पावसाने फोल ठरविले आहे.

ठळक मुद्देअत्यल्प पाऊस : मोठ्या व मध्यम जलाशयात ३३.३१ टक्के पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा प्रारंभी समाधानकारक पाऊस येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण नागरिकांसह हवामान खात्याचे भाकित पावसाने फोल ठरविले आहे. अद्याप जिल्ह्यातील जलाशयांमध्ये नाममात्र जलसाठाच आहे. जिल्ह्यात १५ मोठ्या व मध्यम जलाशयात ३३.३१ टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये २३ टक्केच पाणीसाठी असल्याची नोंद घेण्यात आली आहे.यावर्षी मान्सून वेळेवर सक्रिय होऊन समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आला होता; पण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, शेतकºयांसह सामान्यांची चिंता वाढली आहे. हीच स्थिती पूढेही कायम राहिल्यास जिल्ह्याला कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. यंदा सुरूवातीला निसर्गाच्या लहरीपणाचा जिल्ह्यातील शेतकºयांना फटका बसला. बहुतांश शेतकºयांनी दुबार पेरणी केली. वेळोवेळी झालेला पाऊस पेरणीयोग्य राहिल्याने शेतकºयांनीही पेरणीची कामे पूर्ण केली आहे. शेतकºयांनाही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अद्याप नदी-नाले दुथडी भरून वाहतील, असा पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु जलाशयांतील पाणी पातळीतही वाढ झालेली नाही. मागील वर्षी याच कालावधीत बहुतांश जलाशये १०० टक्के भरली होती.सध्या बोर प्रकल्पात १९.२८ टक्के, धाम प्रकल्पात २६.९५ टक्के, पोथरा ४३.३५ टक्के, पंचधारा ४४.२३, डोंगरगाव ३३.११ टक्के, मदन प्रकल्प ४४.३२ टक्के, मदन उन्नई धरण १७.७८ टक्के, लाल नाला प्रकल्प १७.४२ टक्के, नांद प्रकल्पात ३४.१४ टक्के, वडगाव प्रकल्पात ४१.१७ टक्के, उर्ध्व वर्धा धरण ४१.८६ टक्के, वर्धा कार नदी प्रकल्प १५.७९ टक्के, निम्न वर्धा २४.२८ टक्के तर बेंबळा प्रकल्पात २८.२७ टक्के जलसाठा आहे.लघु प्रकल्पांतील सुकळी २८.८२ टक्के, कवाडी ४०.१४ टक्के, सावंगी १५.४४ टक्के, लहादेवी ३६.३० टक्के, पारगोठाण ८.४८ टक्के, अंबाझरी २९.७९ टक्के, पांजरा बोथली १५.५९ टक्के, उमरी २७.०७ टक्के, टेंबरी ९.४३ टक्के, आंजी-बोरखेडी ३३.८२ टक्के, दहेगाव (गोंडी) ४७.६२ टक्के, कुºहा २४.१५ टक्के, रोठा एक २०.८९ टक्के, रोठा दोन २१.५ टक्के, आष्टी ७.७४ टक्के, पिलापूर १४.२५ टक्के, कन्नमवारग्राम १०.३५ टक्के, मलकापूर ३.२६ टक्के, परसोडी १२.८ टक्के, हराशी ३०.९४ टक्के तर टाकळी-बोरखेडी तलावामध्ये २०.१० टक्केच जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यातील जलाशये तुडूंब भरली होती. तलावही ओव्हर फ्लो झाले होते; पण यंदा ५० टक्केही साठा झाला नाही. काही दिवस पाऊस न आल्यास भविष्यात पाणीटंचाईची शक्यता वर्तविली जात आहे.मागील वर्षी २० जलाशयात होता ५८.२५ टक्के साठामागील वर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील २० लघु जलाशयात ५८.२५ टक्के पाणीसाठा होता. यंदा हा आकडा दमदार पाऊस न झाल्याने २३ टक्क्यांवर स्थिरावला आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील १५ मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये ४७.२६ टक्के जलसाठा होता. त्यावेळी आष्टी तालुक्यातील पिलापूर तलाव १०० टक्के, मलकापूर जलाशय ९९.९ टक्के तर आर्वी तालुक्यातील कवाडी तलाव ९०.५८ टक्के भरला होता.