शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

Wardha | ३४९ सराईत गुन्हेगार गणेश विसर्जनापर्यंत हद्दपार; सोशल मीडियावरही ‘सायबर’चा वॉच

By चैतन्य जोशी | Updated: September 3, 2022 15:55 IST

कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

वर्धा : दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात होणाऱ्या विविध सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून तब्बल ३४९ सराईत गुन्हेगारांना गणपती विसर्जन होईस्तोवर हद्दपार करण्याच आदेश पोलीस विभागाने पारित केला आहे. पोळा, गणेशोत्सव शांतते पार पडावा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश बजावले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात दोन वर्षे जाहीर कार्यक्रमांना मर्यादा होत्या. मात्र, यंदा निर्बंधमुक्त वातावरणात सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होणार आहेत. उत्सव काळात असामाजिक तत्वांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांनी अशांतता निर्माण करु नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना हद्दपार करण्यासंबंधिचा प्रस्ताव चारही उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर ठाणेदारांनी तयार केला होता. त्यानुसार गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. या गुन्हेगारांना गणेशविसर्जनापर्यंत जिल्ह्यात वस्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.

रामनगर हद्दीतील तीन टोळ्या हद्दपार

सण उत्सव काळात शहारात शांतता राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कलम ५५ अंतर्गत रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी करणाऱ्या ३ सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGaneshotsavगणेशोत्सवwardha-acवर्धा