शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

एन.ए.ची माहिती देण्यासाठी आता ३० दिवसांची मुदत

By admin | Updated: September 5, 2014 00:00 IST

एन.ए.(बिन शेती) परवाण्याच्या नवीन नियमानुसार एन.ए.धारकाने जमीन वापराचे रुपांतरण केल्याच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत त्याची माहिती ग्रामअधिकारी किंवा तहसीलदाराना लेखी स्वरुपात देणे

गौरव देशमुख - वायगाव(नि.)एन.ए.(बिन शेती) परवाण्याच्या नवीन नियमानुसार एन.ए.धारकाने जमीन वापराचे रुपांतरण केल्याच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत त्याची माहिती ग्रामअधिकारी किंवा तहसीलदाराना लेखी स्वरुपात देणे बंधनकारक केले आहे. शासनाच्या वतीने तसे परिपत्रकानिसार कलविण्यात आले आहे. या निर्णयानुसार संबंधित व्यक्तीने वेळेत माहिती न दिल्यास अकृषक आकारणी देण्याबरोबरच अधिक २५ हजार रुपये किंवा अकृषक आकारणीच्या चाळीसपट, यापैकी जी रक्कम अधिक असेल ती करापोटी भरावी लागणार आहे. त्यामुळे आता एन.ए.ची परवानगी घेऊन वर्षानुवर्ष त्या जमिनीचा घेतलेल्या कारणासाठी वापर न करणाऱ्याना आळा बसणार आहे. संबंधित कार्यालयाकडे असलेली एन.ए.ची वेळखाऊ प्रक्रीया लवकर करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता बिनशेती परवाण्यासाठी शहरी भागात जिल्हाधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीची गरज राहणार नाही. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना विभाग त्याला परवानगी देईल. मात्र भोगवटदार वर्ग २ म्हणून धारण केलेल्या किंवा शासनपट्ट्याने दिलेल्या जमिनीवरील एन.ए.साठी जिल्हाधिकाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याची संपूर्ण तपासणी करूणच जर प्रमाणपत्र देणे शक्य असेल तरच ते दिले जाईल अन्यथा त्यावरील नजराणा आणि इतर शासकीय कर अथवा देय दिल्यानंतरच त्यास जमीन वाराबद्दलचे प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रमाणपत्र जमीन मालकांनी महाराष्ट्र राज्य प्रादेशिक नियोजन व नगररचना विभागाला सादर केल्यानंतर संबंधित विभागामार्फत बिनशेतीचा दाखला देण्यात येणार आहे. त्यात अधिकाऱ्याना सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे. तीस दिवसांच्या आत जमीन मालकाने एन.ए.ची माहिती देणे बंधनकारक आहे. त्याच प्रमाणे सर्व कागदपत्रे अटीशर्ती पूर्ण केल्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर पुढील तीस दिवसात संबंधित महसूल प्राधिकाऱ्यांनी एन. ए. प्रमाणपत्र संबंधितास देणे बंधन कारक आहे. तसे न झाल्यास प्राधिकाऱ्यास विलंबाची लेखी कारणे घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर यात लेखी अथवा अंकगणितीय अशी कुठलीही चुक झाल्यास त्यात संबंधित अधिकाऱ्यास स्वत:हून किंवा एन.ए. धारकाच्या मर्जीवरून दुरूस्ती करण्याचेही अधिकार शासनाने दिले आहेत.