शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
4
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
5
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
6
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
7
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
8
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
9
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
10
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
11
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
12
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
13
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
14
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
15
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
16
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
17
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
18
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

२६ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत

By admin | Updated: December 13, 2014 02:16 IST

मोरांगणा परिक्षेत्रातील एकूण ५ तलाठी साजातील २८ गावांपैकी २६ गावांची आणेवारी ५० पैशांच्या आत निघाली़ यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना...

खरांगणा (मो़) : मोरांगणा परिक्षेत्रातील एकूण ५ तलाठी साजातील २८ गावांपैकी २६ गावांची आणेवारी ५० पैशांच्या आत निघाली़ यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले़अत्यल्प पावसामुळे परिसरातील मुख्य पेरा असलेले सोयाबीन हातचे गेले़ एकरी २० ते ६० किलोपर्यंतच ज्वारीच्या दाण्यासारख्या सोयाबीनचा उतारा आला़ कपाशीवरही लाल्या व करपा रोग आल्याने खर्च भरून निघाण्याइतकेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती येताना दिसत नाही़ सर्कलमधील बरीच गावे डोंगराळ भागात आहे़ कोरडवाहू शेतीचे प्रमाणही अधिक आहे़ शेतीवर खर्चच अधिक प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ मंडळ निरीक्षकांच्या देखरेखीत प्रत्येक तलाठी साजात टाकण्यात आलेल्या प्लॉटमधील उत्पन्नावर आधारित काढलेली पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे़ सर्कलमध्ये २८ गावे समाविष्ट आहेत़ पैकी महाकाळी धरणात गेल्याने व खापरी रिठ असल्याने आणेवारीत समायोजित झाली नाही़ २६ गावांमध्ये मोरांगणा ४५ पैसे, पाणवाडी ५०, भादोड ४८, बोथली नटाळा ४५ पैसे, कासारखेडा ४९, तळेगाव रघुजी ४६, काचनुर ४३, दहेगाव गोंडी ४५, सहेली ४७, मदना ४७, सालई मजरा ४७, सावद ४६, खरांगणा ४९, पाटण ४१, नान्ही ४३, वानरकुंड ४२, विटपूर ४६, बोरखेडी ४६, ठेका सावद ४४, माळेगाव काळी ४६, ब्राह्मणवाडा ४१ याप्रमाणे आणेवारी असल्याची माहिती महसूल मंडळ निरीक्षक धकाते व तलाठी कांबळे यांनी जाहीर केली़(वार्ताहर)