शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

एकराला २५ किलो सोयाबीन, मळणीचा खर्च द्यायचा कसा?, शेतकऱ्यांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 13:04 IST

रोगाच्या प्रादुर्भावाने तोंडचा घास हिरावला

सुधीर खडसे

समुद्रपूर (वर्धा) : यावर्षी सर्वप्रथम पावसाने मारलेली दडी आणि त्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. समुद्रपूर तालुक्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा असून, या परिसरातील मांडगावमध्ये सोयाबीनला एकरी २५ किलो उतारा आल्यामुळे शेतकऱ्यांना मळणीचा खर्चही परवडेनासा झाला आहे. त्यामुळे इतक्या कमी उत्पादनात शेतकरी जगणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांना दिवाळीचा सण साजरा करता यावा म्हणून सोयाबीन हे बोनस पीक समजले जाते. दिवाळीपूर्वी हे पीक घरी येत असून, यातून मिळणाऱ्या पैशांतून शेतकरी दिवाळी साजरी करतो. जिल्ह्यात यावर्षी ४ लाख ५ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली होती. यामध्ये १ लाख २६ हजार हेक्टरवर सोयाबीन होते. त्यात आठही तालुक्यांत सर्वाधिक २४ हजार ४१४ हेक्टरवर एकट्या समुद्रपूर तालुक्यात सोयाबीनची लागवड करण्यात आली.

सुरुवातीला आणि सोयाबीन फुलावर असताना पावसाने चांगलीच दडी मारली. त्यामुळे बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव होऊन शेंगा लागण्यापूर्वीच सोयाबीन करपायला लागले. काही सोयाबीनला शेंगा लागल्या; परंतु त्या पूर्णत: भरल्याच नाही. त्यामुळे आता मळणी केल्यानंतर उत्पादनात कमालीची घट झाली. तालुक्यातील मांडगाव शिवारात तर एकरी २५ किलो सोयाबीनचे उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारण्याचीच वेळ आली आहे. अशीच साधारणत: परिस्थिती जिल्ह्यातील इतरही भागातील असून, शासनाने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.

रबी हंगामाची तयारी कुठून करणार?

रबीच्या हंगामाची तयारी खरिपाच्या उत्पादनावर अवलंबून असते. परंतु, खरिपातच सोयाबीनने धोका दिल्याने त्यासाठी केलेला खर्चही भरून निघाला नाही. आता रबीकरिता शेताची मशागत आणि बी-बियाणांची तडजोड आणि पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारण्याचीच वेळ आली आहे.

मी अल्पभूधारक शेतकरी असून, दोन एकरामध्ये सोयाबीनची लागवड केली होती. याकरिता पैशांची तडजोड करुन शेती फुलविली. पण, आता मळणी केल्यानंतर दोन एकरात केवळ ५० किलो सोयाबीन झाल्याने खर्चही भरुन निघाला नाही. शासनाने एक रुपयात पीकविमा काढून दिला; परंतु अद्यापही पंचनामे झाले नाही.

- केशव तिमांडे, शेतकरी, मांडगाव

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCropपीकFarmerशेतकरीwardha-acवर्धा