शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

२ हजार ६०० रुग्णांनी घेतला जीवनदायी योजनेचा लाभ

By admin | Updated: December 13, 2014 22:43 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यात २ जुलै २०१२ पासून राबविण्यात आली. महाराष्ट्रातील उर्वरीत २७ जिल्ह्यात ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून सुरू करण्यात आली.

वर्धा : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यात २ जुलै २०१२ पासून राबविण्यात आली. महाराष्ट्रातील उर्वरीत २७ जिल्ह्यात ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून सुरू करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २ हजार ६०० रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना या योजनेचा लाभ देताना शासनाचे ६ कोटी ५० लक्ष रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी दिली. योजनेचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, गंभीर आजार आणि त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गरजू रुग्णांना शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार दिला आहे. या योजनेला जिल्ह्यात एक वर्ष पूर्ण झालेले असून, ही योजना शासन पुढील एक वर्षासाठी नुतनीकरण करून राबवित असून योजनेचा लाभ घेण्याचे त्यांनी कळविले आहे. महाराष्ट्र राज्यातील पिवळे किंवा केशरी राशन कार्ड धारकांना १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत विम्याचे संरक्षण चालू राहणार आहे. म्हणजे एखाद्या कुटुंबावर पहिल्या वर्षी कितीही औषधोपचारावर खर्च झाला असला तरीही नव्याने नुतनीकरणानंतर दीड लाखांचे विमा संरक्षण सुरू राहणार आहे. योजनेत ९७१ आजार व १२१ पाठपुरावा आजार समाविष्ट आहेत. योजनेत लाभार्थी कुटुबांतील रुग्णास रुग्णालयाचा खर्च, औषधोपचार खर्च, संपूर्ण तपासणीचा खर्च, शस्त्रक्रियेचा खर्च, रुग्णास दोन वेळेचे जेवण व परतीचा प्रवासाचा खर्च पुरविला जातो. हा खर्च विमा कंपनीमार्फत रुग्णालयास देय केला जातो. राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ४८० मान्यता प्राप्त रुग्णालय आहेत. जिल्ह्यात मान्यता प्राप्त रुग्णालयात जिल्हा सामान्य रुग्णालय, कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी, राणे हॉस्पिटल आर्वी यांचा समावेश आहे. लाभार्थी कुटुंब योजनेचा लाभ राज्यातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात घेवू शकतो. योजनेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पीयूष सिंग यांनी १० डिसेंबर २०१४ रोजी वर्धेत रुग्णालयांना भेट देत कार्याची प्रशंसा केली.(प्रतिनिधी)