लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलसंकट गडद झाले होते. यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी प्रखर उष्णतामानामुळे नदी-नाले कोरडेठाक होतात. ही बाब लक्षात घेता वनविभागाने जिल्ह्यातील आठ वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांची तहान भागविण्याकरिता नैसर्गिक आणि कृत्रिम १७३ पाणवठ्यांची निर्मिती केली आहे. याशिवाय प्राण्यांच्या हालचालीवर वॉच ठेवण्याकरिता प्रत्येकी २० ते २२ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.दरवर्षी जलसंकट निर्माण होत असले तरी यावेळी जिल्ह्यातील जलसाठ्याची परिस्थिती चांगली आहे. मात्र, उन्हाचा पारा चढत जातो, तसे जंगल परिसरातील नदी-नाले कोरडे होतात. वनविभागाकडून साधारणत: मार्चच्या सुमारास कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची निर्मिती केली जाते. आठ वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांकरिता हातपंप, टाके, बशी टाके, नैसर्गिक झरा, तलाव, सौरपंप आदी प्रकारचे पाणवठे असून वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास उपयोगी ठरत आहेत. कारंजा वनपरिक्षेत्रात २३, तळेगाव २१, आर्वी २४, आष्टी (शहीद) २२, हिंगणी १८, वर्धा १, समुद्रपूर २८, तर खरांगणा वनपरिक्षेत्रात ३६ पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक वनपरिक्षेत्रात प्रत्येकी २० ते २२ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत या माध्यमातून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसोबतच हालचालींवर वनविभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.लिटमस पेपरने होते जलचाचणीउन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी भटकंती करतात. बहुतांशवेळी गावाकडे धाव घेतात. याच दरम्यान जंगल परिसरातील नदी-नाल्यांना कोरड पडत असल्याने वन्यप्राण्यांकरिता कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. मात्र, शिकाऱ्यांकडून धोका उद्भवू नये म्हणन पाणवठ्यात टाकल्या जाणाऱ्या पाण्याची दर दोन दिवसांनी वनरक्षकाकडून लिटमस पेपरच्या सहाय्याने चाचणी केली जाते. पाण्याचा रंग बदला म्हणजे ते विषारी झायाचे समजून पाणवठ्यातील पाणी बदलविले जाते. कर्मचाऱ्यांकडून सातत्याने गस्त घातली जाते. वनपरिक्षेत्रातील संबंधित अधिकारी, कर्मचाºयांकडून यावर विशेष लक्ष ठेवले जाते.
१७३ पाणवठे भागविताहेत वन्यप्राण्यांची तृष्णा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST
दरवर्षी जलसंकट निर्माण होत असले तरी यावेळी जिल्ह्यातील जलसाठ्याची परिस्थिती चांगली आहे. मात्र, उन्हाचा पारा चढत जातो, तसे जंगल परिसरातील नदी-नाले कोरडे होतात. वनविभागाकडून साधारणत: मार्चच्या सुमारास कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची निर्मिती केली जाते. आठ वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांकरिता हातपंप, टाके, बशी टाके, नैसर्गिक झरा, तलाव, सौरपंप आदी प्रकारचे पाणवठे असून वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास उपयोगी ठरत आहेत.
१७३ पाणवठे भागविताहेत वन्यप्राण्यांची तृष्णा
ठळक मुद्देआठ वनपरिक्षेत्रातील स्थिती : प्रत्येक क्षेत्रात २० ते २२ ट्रॅप कॅमेऱ्यांचा ‘वॉच’