शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

१५ जुलैनंतर वर्धेत पाणी पेटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:30 PM

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पात ...

ठळक मुद्दे‘धाम’ मध्ये केवळ नाममात्र जलसाठा : आकाशाकडे साऱ्यांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पात सध्या केवळ नाममात्र मृत जलसाठा आहे. या जलसाठ्याचे योग्य नियोजन करून त्या पाण्याचा केवळ १५ जुलैपर्यंत नागरिकांना पुरवठा केल्या जाऊ शकत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वीच पाऊस लांबला गेल्याने आणि आणखी काही दिवस हीच परिस्थिती राहत दमदार पाऊस न झाल्यास वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांत पाणी समस्या पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच करणे गरजेचे आहे.महाकाळी येथील धाम प्रकल्पात ३२८.६०० दलघमी पाणी साठविल्या जाऊ शकते. परंतु, मागील दोन वर्षात दमदार पाऊस जिल्ह्यात न झाल्याने हा प्रकल्प पाहिजे त्या प्रमाणात भरला नाही. शिवाय जेव्हा हा प्रकल्प तयार करण्यात आला तेव्हापासून या प्रकल्पातून एक ट्रॉलीही गाळ काढण्यात आला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाणी साठवण क्षमता कमीच झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. अशातच यंदा या प्रकल्पाला गाळमुक्त करण्याचा विडा जिल्हा प्रशासनासह वर्धा पाटबंधारे विभागाने उचलला असता तरी मागील १ महिना २३ दिवसात केवळ ४० हजार घ.मी. गाळ काढण्यात आला आहे. वास्तविक पाहता या प्रकल्पात सुमारे ५ लाख घ.मी. गाळ असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांचा आहे. तर याच प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा न.प. प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग करून पाण्याचा पुरवठा नागरिकांना करते. मात्र, सध्या स्थितीत या प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा पूर्णपणे संपला असून सध्या मृत जलसाठ्याची उचल केली जात आहे. काही दिवसांपूर्वी वर्धा पाटबंधारे विभागाने वर्धा शहर व परिसरातील १३ गावांमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन प्रकल्पातील पाणी सोडले होते. त्यामुळे सध्या या प्रकल्पातील मृत जलसाठ्यात किमान एक ते दीड मिटरने घट झाल्याचे वास्तव आहे. तर सध्या असलेल्या मृत साठ्यापैकी जास्तीत जास्त ३ दलघमी पाण्याची उचल करता येईल. शिवाय ते पाणी नागरिकांना १५ जुलैपर्यंत देता येईल असा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. मात्र, येत्या काही दिवसात दमदार पाऊस होत धाम नदी दुथडी भरून न वाहिल्यास तसेच धाम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ न झाल्यास जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्यापासून भीषण पाणी समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.गाळ नेण्याकडे शेतकऱ्यांची पाठधाम प्रकल्पातून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांनी नि:शुल्क न्यावा, असे आवाहन कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाºयांनी केले आहे. परंतु, सदर गाळ शेतापर्यंत नेण्यासाठी लागणारा खर्च मोठा असल्याने आणि तो या भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना न परवडणारा असल्याने कुणीही शेतकरी गाळ नेण्यासाठी पसंदी दर्शवित नसल्याचे चित्र या परिसरात बघावयास मिळत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य पाऊल उचलत धाम प्रकल्प गाळमुक्त करून या भागातील शेतशिवार गाळयुक्त करावे, अशी मागणी आहे.