शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला भेटण्याची ओढ; पत्नीचे दागिने गहाण ठेवून बोगद्याजवळ पोहोचला 'बाप'माणूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 16:06 IST

वडिलांनी चक्क पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेऊन उत्तरकाशी गाठली.  

डेहरादून - अखेर गेल्या १६ दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज यशस्वी झाली असून उत्तरकाशी येथील बोगद्यातील मजुरांपर्यंत एनडीआरएफ जवानांची टीम पोहोचली आहे. त्यामुळे, काही वेळातच बोगद्या अडकलेले मजूर सुखरुप बाहेर येणार आहेत. या मजुरांच्या स्वागतला राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मान्यवर उपस्थित आहेत. तर, मजुरांचे कुटुंबही त्यांच्या मूळ गावाहून उत्तरकाशी येथील बोगद्याबाहेर आपल्या मुलांची, वडिलांची, भावाची आप्तेष्टांची कासावीस होऊन वाट पाहत आहेत. बोगद्यातील आपल्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी एका वडिलांनी चक्क पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेऊन उत्तरकाशी गाठली.  

बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेकडे गेल्या १७ दिवसांपासून भारतासह अवघ्या जगाच्या नजरा लागल्या आहेत. बोगद्यात अडकलेल्या मुजरांचे नेमके काय झाले, ते सुखरुप आहेत का, असे अनेक प्रश्न कुटुंबीयांसह प्रशासन आणि बचाव पथकाला पडले होते. अखेर, एका कॅमेऱ्याद्वारे मजुरांशी संवाद साधल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. त्यानंतर, युद्धपातळीवर या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून एनडीआरएफची टीम तिथपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे, काही क्षणातच हे मजुर बोगद्यातून बाहेर येणार आहेत. बाहेर येताच आपल्या कुटुंबीयांना बिलगणार आहेत. कारण, मृत्यूच्या दाढेतून बाहेर येणं ते काय असतं हा थरार त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांना गेल्या १७ दिवसांपासून अनुभवला आहे. 

सर्वजण रोजंदारी मजूर असल्याने अर्थातच त्यांची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे, आपल्या लेकरांना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनीही प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. उत्तरकाशी येथे येण्यासाठी पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेऊन पैसे गोळा केले. ९ हजार रुपये घेऊन मी इथे आलो होतो, आता २९० रुपये शिल्लक राहिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून इथे असल्याने हळू हळू पैसे खर्च होत आहेत, असे म्हणत बोगद्यात अडकलेल्या मजुराच्या वडिलांनी आपली व्यथा माध्यमांसमोर मांडली. 

बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर डेहरादून येथे सर्वांना नेण्यात येणार आहे. तिथे गंगास्नान करुन त्यांना पुढील ठिकाणी पाठवण्यात येईल. आज सकाळपासूनच हलकासा पाऊस पडत आहे. सर्व मजूर बाहेर येत असताना देवानेही आशीर्वाद दिल्याचा हा शुभशकून आहे. बोगद्यातून आमचा मुलगा बाहेर येईल आणि आमच्या जीवात जीव येईल, असे म्हणत मजुराच्या वडिलांनी मुलगा सुखरुप परत येत असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, मुलाला वापर नेण्यासाठी त्याचे कपडे आणि आवश्यक सामानही घरुन आणलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

कुटुंबीय बोगद्याबाहेर, सर्वांचाच जीव भांड्यात पडला

बोगद्यात खोदाई संपली असून अडकलेल्य़ा ४१ मजुरांपर्यंत ८०० मीमी व्यासाचा पाईप टाकण्यात आले आहेत. या पाईपमधून एनडीआरएफची टीम मजुरांपर्यंत पोहोचली आहे. बोगद्यामध्ये अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना देखील बोलविण्यात आले आहे. सर्वच्या सर्व ४१ मजूर ठीक असावेत अशी प्रार्थना केली जात आहे. रेस्क्यू टीमने मजुरांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांचे कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहेत.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडLabourकामगारFamilyपरिवारRainपाऊसNational Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल