शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:41 IST

Vishnu Deo Sai: जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी एकमेकांसोबत समन्वय ठेवून काम केले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री साय यांनी दिले. 

CM Vishnu Deo Sai News: पोलिसांना बघितल्यावर गुन्हेगारांना भीती वाटली पाहिजे, तर लोकांना सुरक्षित असल्याचे जाणवले पाहिजे, अशी पोलिसांची प्रतिमा असायला हवी, असे सांगत छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी अधिकाऱ्यांना समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री साय हे महानदी भवन येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या परिषदेत बोलत होते. 

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, अमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण, रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हेगारीला लगाम आणि प्रशासकीय समन्वय बळकट करणे अशा विषयांवर या परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली. 

'जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या दोघांची भूमिका सारखीच महत्त्वाची आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये या दोघांमध्ये समन्वय मजबूत आहे, तिथे चांगले बदल दिसले आहेत', असे मुख्यमंत्री म्हणाले. 

ढिसाळपणा केला, तर कारवाई करणार

'कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा ढिसाळपणा प्रशासकीय उदासीनता मानली जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये कारवाई केली जाईल', असा इशारा मुख्यमंत्री साय यांनी दिला. 

'गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भात 'झिरो टॉलरन्स' धोरण आहे. रस्त्यावर अव्यवस्था निर्माण करणे, चाकू दाखवणे आणि खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' धोरण अमलात आणावे. गो-तस्करी (गाईंची तस्करी) आणि धर्मांतरणासारख्या संवेदनशील प्रकरणांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. ज्या जिल्ह्यांनी गुन्हेगारी कमी करण्यात उल्लेखनीय सुधारणा केली आहे, त्यांचे अनुभव इतर जिल्ह्यांमध्ये आदर्श म्हणून लागू करा', असेही मुख्यमंत्री साय म्हणाले. 

'अंमली पदार्थ हे गुन्ह्यांचे मूळ आहे आणि ते नष्ट करणे ही कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठीची पहिली अट आहे. एनकॉर्ड (NCORD) अंतर्गत राज्यव्यापी मोहीम चालवण्यात यावी, सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये तस्करी थांबवण्याचे आणि एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत वेळेत कारवाई करा. तरुणांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी', असेही त्यांनी सांगितले.

घुसखोरी रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्स करा

'घुसखोरांवर नियंत्रण आणि माओवाद्यांचे पुनर्वसन राज्यात घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष टास्क फोर्स (STF) स्थापन करण्यात आला आहे. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये कसून तपासणी करण्याचे आणि संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई केली जावी', असे मुख्यमंत्री साय म्हणाले.

आत्मसमर्पित माओवाद्यांचे पुनर्वसन आणि उपजीविका सक्षमीकरणावरही चर्चा झाली. पुनर्वसन धोरणावर माओवाद्यांचा विश्वास कायम ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यास त्यांनी सांगितले, तसेच आत्मसमर्पित माओवाद्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन स्थानिक रोजगार किंवा स्वयंरोजगाराशी जोडावे, जेणेकरून ते सन्मानाने मुख्य प्रवाहात जीवन जगू शकतील.

English
हिंदी सारांश
Web Title : CM Sai: Law should deter criminals, protect the public.

Web Summary : Chhattisgarh CM Vishnu Deo Sai directed officials to maintain law and order, control drug trafficking, curb cybercrime, and strengthen administrative coordination. He stressed zero tolerance for serious crimes and focused action on Naxal issues.
टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडPoliceपोलिस