शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
3
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
4
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
5
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
6
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
7
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
8
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
9
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
10
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
11
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
12
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
13
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
14
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
15
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
16
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
17
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
18
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
19
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
20
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव

कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:41 IST

Vishnu Deo Sai: जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी एकमेकांसोबत समन्वय ठेवून काम केले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री साय यांनी दिले. 

CM Vishnu Deo Sai News: पोलिसांना बघितल्यावर गुन्हेगारांना भीती वाटली पाहिजे, तर लोकांना सुरक्षित असल्याचे जाणवले पाहिजे, अशी पोलिसांची प्रतिमा असायला हवी, असे सांगत छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी अधिकाऱ्यांना समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री साय हे महानदी भवन येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या परिषदेत बोलत होते. 

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, अमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण, रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हेगारीला लगाम आणि प्रशासकीय समन्वय बळकट करणे अशा विषयांवर या परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली. 

'जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या दोघांची भूमिका सारखीच महत्त्वाची आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये या दोघांमध्ये समन्वय मजबूत आहे, तिथे चांगले बदल दिसले आहेत', असे मुख्यमंत्री म्हणाले. 

ढिसाळपणा केला, तर कारवाई करणार

'कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा ढिसाळपणा प्रशासकीय उदासीनता मानली जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये कारवाई केली जाईल', असा इशारा मुख्यमंत्री साय यांनी दिला. 

'गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भात 'झिरो टॉलरन्स' धोरण आहे. रस्त्यावर अव्यवस्था निर्माण करणे, चाकू दाखवणे आणि खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' धोरण अमलात आणावे. गो-तस्करी (गाईंची तस्करी) आणि धर्मांतरणासारख्या संवेदनशील प्रकरणांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. ज्या जिल्ह्यांनी गुन्हेगारी कमी करण्यात उल्लेखनीय सुधारणा केली आहे, त्यांचे अनुभव इतर जिल्ह्यांमध्ये आदर्श म्हणून लागू करा', असेही मुख्यमंत्री साय म्हणाले. 

'अंमली पदार्थ हे गुन्ह्यांचे मूळ आहे आणि ते नष्ट करणे ही कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठीची पहिली अट आहे. एनकॉर्ड (NCORD) अंतर्गत राज्यव्यापी मोहीम चालवण्यात यावी, सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये तस्करी थांबवण्याचे आणि एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत वेळेत कारवाई करा. तरुणांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी', असेही त्यांनी सांगितले.

घुसखोरी रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्स करा

'घुसखोरांवर नियंत्रण आणि माओवाद्यांचे पुनर्वसन राज्यात घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष टास्क फोर्स (STF) स्थापन करण्यात आला आहे. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये कसून तपासणी करण्याचे आणि संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई केली जावी', असे मुख्यमंत्री साय म्हणाले.

आत्मसमर्पित माओवाद्यांचे पुनर्वसन आणि उपजीविका सक्षमीकरणावरही चर्चा झाली. पुनर्वसन धोरणावर माओवाद्यांचा विश्वास कायम ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यास त्यांनी सांगितले, तसेच आत्मसमर्पित माओवाद्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन स्थानिक रोजगार किंवा स्वयंरोजगाराशी जोडावे, जेणेकरून ते सन्मानाने मुख्य प्रवाहात जीवन जगू शकतील.

English
हिंदी सारांश
Web Title : CM Sai: Law should deter criminals, protect the public.

Web Summary : Chhattisgarh CM Vishnu Deo Sai directed officials to maintain law and order, control drug trafficking, curb cybercrime, and strengthen administrative coordination. He stressed zero tolerance for serious crimes and focused action on Naxal issues.
टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडPoliceपोलिस