शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

विलीनीकरण होणार की नष्ट होणार? भविष्यात पाकिस्तानचं काय होणार? CM योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 12:15 IST

मुख्यमंत्री योगी म्हणाले, जर 1947 मध्ये भारतातील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती, तर जगातील कुठलीही शक्ती देशाची अनैसर्गिक फाळणी करू शकली नसती.

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे फाळणीच्या स्मृती दिना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानच्या भविष्यासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. भविष्यात पाकिस्तान भारतात विलीन होईल, असे त्यांनी संकेतिकपणे म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाकिस्तानसंदर्भात दावा करताना म्हणाले की, एक तर पाकिस्तानचे विलिनिकरण होईल अथवा तो नष्ट होईल.

जेव्हा-जेव्हा काँग्रेसला संधी मिळाली... -मुख्यमंत्री म्हणाले, फाळणीच्या शोकांतिकेसाठी काँग्रेस कधीही माफी मागणार नाही. जेव्हा-जेव्हा काँग्रेसला संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्यांनी देशाचा गळा घोटला आहे. त्यांना कधीही क्षमा केली जाऊ शकत नाही. बांगलादेशात 1947 मध्ये 22% हिंदू होते. आज 7% उरले आहेत. त्या सर्व हिंदूंसोबत आमची सहानुभूती असायला हवी. अखंड भारताचे स्वपच अशा प्रकारच्या घटनांचे समाधान असेल.

काँग्रेसच्या सत्तेच्या लालसेने भारताला बर्बाद केले -मुख्यमंत्री योगी म्हणाले, जर 1947 मध्ये भारतातील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती, तर जगातील कुठलीही शक्ती देशाची अनैसर्गिक फाळणी करू शकली नसती. मात्र काँग्रेसच्या सत्तेच्या लालसेने भारताला बर्बाद केले. यांच्याकडे जेव्हा जेव्हा सत्ता गेली, तेव्हा तेव्हा त्यानी देशाचे मोल लावून राजकारण केले.

आज जगात कुठेही संकट आले, तरी... -"1947 ला पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्ष तिरंगा फडकावत आनंदोत्सव साजरा करत होते, तेव्हा असंख्य लोकांना मातृभूमी सोडावी लागली होती. गेल्या 10 वर्षात भारताची प्रगती जगाला चकित करणारी आहे. यामुळेच आज जगात कुठेही संकट आले, तर जग भारताकडे मोठ्या आशेने बघते," असेही योगी म्हणाले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस