शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विलीनीकरण होणार की नष्ट होणार? भविष्यात पाकिस्तानचं काय होणार? CM योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 12:15 IST

मुख्यमंत्री योगी म्हणाले, जर 1947 मध्ये भारतातील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती, तर जगातील कुठलीही शक्ती देशाची अनैसर्गिक फाळणी करू शकली नसती.

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे फाळणीच्या स्मृती दिना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानच्या भविष्यासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. भविष्यात पाकिस्तान भारतात विलीन होईल, असे त्यांनी संकेतिकपणे म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाकिस्तानसंदर्भात दावा करताना म्हणाले की, एक तर पाकिस्तानचे विलिनिकरण होईल अथवा तो नष्ट होईल.

जेव्हा-जेव्हा काँग्रेसला संधी मिळाली... -मुख्यमंत्री म्हणाले, फाळणीच्या शोकांतिकेसाठी काँग्रेस कधीही माफी मागणार नाही. जेव्हा-जेव्हा काँग्रेसला संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्यांनी देशाचा गळा घोटला आहे. त्यांना कधीही क्षमा केली जाऊ शकत नाही. बांगलादेशात 1947 मध्ये 22% हिंदू होते. आज 7% उरले आहेत. त्या सर्व हिंदूंसोबत आमची सहानुभूती असायला हवी. अखंड भारताचे स्वपच अशा प्रकारच्या घटनांचे समाधान असेल.

काँग्रेसच्या सत्तेच्या लालसेने भारताला बर्बाद केले -मुख्यमंत्री योगी म्हणाले, जर 1947 मध्ये भारतातील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती, तर जगातील कुठलीही शक्ती देशाची अनैसर्गिक फाळणी करू शकली नसती. मात्र काँग्रेसच्या सत्तेच्या लालसेने भारताला बर्बाद केले. यांच्याकडे जेव्हा जेव्हा सत्ता गेली, तेव्हा तेव्हा त्यानी देशाचे मोल लावून राजकारण केले.

आज जगात कुठेही संकट आले, तरी... -"1947 ला पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्ष तिरंगा फडकावत आनंदोत्सव साजरा करत होते, तेव्हा असंख्य लोकांना मातृभूमी सोडावी लागली होती. गेल्या 10 वर्षात भारताची प्रगती जगाला चकित करणारी आहे. यामुळेच आज जगात कुठेही संकट आले, तर जग भारताकडे मोठ्या आशेने बघते," असेही योगी म्हणाले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस