शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"सुशासनाचं लक्ष्य प्राप्त ककरण्यासाठी न्यायव्यवस्था ही सुगम आणि जलद असणं गरजेचं’’, योगी आदित्यनाथ यांचं विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:47 IST

Uttar Pradesh News: आपली न्यायव्यवस्था ही सुगम, त्वरित आणि सुलभ असेल तेव्हाच सुशासनाचं लक्ष्य प्राप्त होऊ शकतं, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी विकसित उत्तर प्रदेश निर्माण करणं आवश्यक आहे.

आपली न्यायव्यवस्था ही सुगम, त्वरित आणि सुलभ असेल तेव्हाच सुशासनाचं लक्ष्य प्राप्त होऊ शकतं, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी विकसित उत्तर प्रदेश निर्माण करणं आवश्यक आहे. तसेच त्यासाठी एक मजबूत आणि त्वरित न्यायव्यवस्था अनिवार्य आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. उत्तर प्रदेश न्यायिक सेवा संघाच्या ४२ व्या अधिवेशनाला योगी आदित्यनाथ यांनी  संबोधित केले. यावेळी उपस्थित न्यायिक अधिकाऱ्यांना संबोधित करताना योगींनी न्यायपालिकेचा सुसाशनाचा रक्षक म्हणून उल्लेख केला. तसेच न्यायव्यवस्थेच्या सुदृढीकरणासाठी उत्तर प्रदेश सरकार कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश न्यायिक सेवा संघाच्या एका स्मरणिकेचं अनावरणही केलं. तसेच न्यायिक सेवा संघासाठी ५० कोटी रुपयांचा फंड देण्याची घोषणाही केली.

उत्तर प्रदेश न्यायिक सेवा संघाच्या ४२ व्या अधिवेशनाचा उल्लेख न्यायिक अधिकाऱ्यांचा महाकुंभ असा करत योगी आदित्यनाथ म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ एकता आणि परस्पर सहकार्याचं प्रतीकच नाही तर व्यावसायिक दक्षता आणि बेस्ट प्रॅक्टिसला प्रोत्साहन देणारा मंचही आहे. यावेळी राज्यभरातून आलेल्या न्यायालयीन अधिकाऱ्यांचं स्वागत करताना योगी यांनी सांगितलं की, भारताची राज्यघटना आपल्या अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश करत असताना हे अधिवेशन आयोजित होत आहे. राज्यघटनेतील न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही तीन तत्त्वे या कार्यक्रमाचा आधार आहेत. ज्या प्रकारे महाकुंभ हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ऐक्याचा प्रतीक आहे, त्याच प्रमाणे हे अधिवेशन न्यायिक अधिकारांच्या ऐक्याचं आणि त्यांच्या व्यावसायिक दक्षतेला प्रदर्शित करते.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये देशातील सर्वात मोठं उच्च न्यायालय आहे. प्रयागराजमध्ये अलाहाबाज उच्च न्यायालयाचं मुख्य पीठ आणि लखनौमध्ये त्याचं असलेलं खंडपीठ राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. ते केवळ आमच्यासमोरच नाही तर देश आणि जगासमोर उत्तर प्रदेशच्या प्रतिमे विश्वासाच्या रूपात प्रदर्शित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. १०२ वर्षांच्या आपल्या इतिहासामध्ये उत्तर प्रदेश न्यायिक सेवा संघाने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. तसेच इथे उपस्थित असलेले सर्व न्यायिक अधिकारी केवळ न्यायिक सेवेशी संबंधित आहेत असे नाही तर ते परस्पर सहकार्य ऐक्य आणि व्यावसायिक दक्षतेचंही एक उत्तम उदाहरण प्रस्तूत करण्यात यशस्वी ठरतील.

या कार्यक्रमाला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरुण भंसाळी, न्यायमूर्ती मनोजकुमार गुप्ता, न्यायमूर्ती राजन राय, न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान, उत्तर प्रदेश न्यायिक सेवा संघाचे रणधीर सिंह, सर्व जिल्ह्यांचे न्यायाधीश आणि निवृत्त न्यायाधीश आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशCourtन्यायालय