शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:16 IST

"राजदच्या १५ वर्षांच्या राजवटीत ६० हून अधि नरसंहार, ३० हजारहून अधिक अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद जोडी जंगलराज घेऊन आली होती."

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एनडीए उमेदवारांसाठी अररियातील सिकटी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. येथे भाजपाने आमदार विजयकुमार मंडल यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी त्यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला केले.

आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस, राजद आणि महागठबंधनावर बिहारमध्ये “जंगलराज” आणल्याचा आरोप केला. योगी म्हणाले, गौरवशाली इतिहास असलेल्या बिहारसमोर संकटे निर्माण करणारेच खरे अपराधी आहेत. ज्यांनी राज्य मागे ढकलले. नागरिकांसमोर ओळखीचे संकट निर्माण केले. आता हे लोक, मोठ-मोठ्या घोषणा करत आहेत आणि नोकरीच्या नावावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ज्यांचा भूतकाळ कलंकित आणि काळा आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. 

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, काँग्रेस आणि राजदच्या काळात बिहारसमोर साक्षरतेचे संकटही उभे होते. मात्र २००५ मध्ये जेव्हा नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार आले, तेव्हा बिहारने प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सिव्हिल सर्व्हंट, आयएएस, आयपीएस, आयएफएस, स्टार्टअप, उद्योजक आदी अनेक क्षेत्रांत काही तरी नवे करत, देश आणि जगासाठी मॉडेल तयार करत आहेत. बिहारच्या विकासाची ही यात्रा थांबूनये. विरोधकांवर टीका करताना योगी म्हणाले, “काँग्रेस आणि राजदची जोडी म्हणजे विकासाला 'जंगलराज'मध्ये बदलणारी जोडी आहे.” राजदच्या १५ वर्षांच्या राजवटीत ६० हून अधि नरसंहार, ३० हजारहून अधिक अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद जोडी जंगलराज घेऊन आली होती. यांच्या शासन काळात व्यापारी, इंजिनिअर, डॉक्टर, मुले आणि मुलीही सुरक्षित नव्हत्या. 

दरम्यान योगी यांनी राममंदिराचाही उल्लेख केला. ते म्हणाले, काँग्रेस-राजद हे “रामद्रोही” आहेत, तर मोदीजींच्या नेतृत्वात आस्थेचा सन्मान, विकास आणि गरीब कल्याण यांसाठी कार्य केले गेले. केंद्र सरकारच्या योजनांमुळे काँग्रेस-राजदची दलाली संपुष्टात आली आहे. आता पैसे थेट लाभारऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. यावेळी, बिहारमध्ये पुन्हा जंगलराज येऊ द्यायचे नाही, असे आवाहनही त्यांनी जनतेला गेले.

English
हिंदी सारांश
Web Title : Yogi Slams Congress-RJD Alliance: Untrustworthy Due to Tainted Past

Web Summary : Yogi Adityanath criticized the Congress-RJD alliance in Bihar, accusing them of a tainted past and promoting 'Jungle Raj'. He highlighted NDA's development under Nitish Kumar and warned against returning to an era of lawlessness and corruption, emphasizing the importance of continued progress and security.
टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५