शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

बहराइच हिंसाचारातील ५ आरोपी अटकेत, एन्काऊंटरमध्ये दोन आरोपी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 16:51 IST

Bahraich Violence: बहराइच हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी करावाई करत या प्रकरणातील आरोपी असलेल्या सफराज आणि फईम यांचा एन्काऊंटर केला आहे. दोन्ही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमधील बहराइच जिल्ह्यात देवीच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान, दोन गटात वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. या दरम्यान, रामगोपाल नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेशपोलिसांनी मोठी करावाई करत या प्रकरणातील आरोपी असलेल्या सफराज आणि फईम यांचा एन्काऊंटर केला आहे. दोन्ही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अब्दुल हमीदचे मुलगे आहेत. या हिंसाचार प्रकरणी आणखी पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

बहराइच हिंसाचार प्रकरणातील आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. याची गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागली.  पोलिसांनी मागावर राहून त्यांचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर नेपाळच्या सीमेजवळ हांडा बसेहरी नहर येथे झालेल्या चकमकीत दोन्ही आरोपींना गोळ्या लागल्या. दरम्यान, आरोपींच्या पायाला गोळ्या लागल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. 

दोन्ही आरोपी हे बहराइच हिंसेदरम्यान मारल्या गेलेल्या रामगोपाल मिश्रा याच्या हत्येमध्ये सहभागी होते, असा दावा करण्यात येत आहे. त्यांनीच इतर सहकाऱ्यांसोबत मिळून गोळीबार केल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचे काही व्हिडीओही व्हायरल होत. आहेत. त्यात अब्दुल हमीद याच्या घराच्या छतावर चार ते पाच लोक दिसून येत आहेत. तिथेच रामगोपाल मिश्रा याच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.

दरम्यान, गोपाल मिश्रा याच्यावर ज्या घराच्या छतावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्या घराचा मालक अब्दल हमीद याची मुलगी रुखसार हिने मात्र वेगळाच आरोप केला आहे. तिने सांगितले की, तिचे वडील, सरफराज आणि फहीम हे दोन भाऊ आणि आणखी एका तरुणाला उत्तर प्रदेश एसटीएफने काल संध्याकाळी ४ वाजता ताब्यात घेतले होते. दरम्यान, तिचा पती आणि दिराला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते, असा आरोपही तिने केला.

बहराइचमधील हरदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेहुआ मंसूर गावामधील रहिवासी असलेल्या रामगोपाल मिश्रा याची रविवारी संध्याकाळी ६ वाजता दुर्गा विसर्जनादरम्यान, झालेल्या वादावेळी हत्या करण्यात आली होती. विसर्जन मिरवणूक महराजगंज येथील एका वस्तीजवळ आली असताना दोन्हीकडून वादावादी झाली आणि त्यादरम्यान छतांवरून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत पळापळ झाली. या दरम्यान, रामगोपाल याच्यावर एका घराच्या छतावर असताना गोळ्या झाडण्यात आल्या. रामगोपाल याच्या हत्येनंतर परिसरातील तणाव आणखीनच वाढला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस