शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

बहराइच हिंसाचारातील ५ आरोपी अटकेत, एन्काऊंटरमध्ये दोन आरोपी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 16:51 IST

Bahraich Violence: बहराइच हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी करावाई करत या प्रकरणातील आरोपी असलेल्या सफराज आणि फईम यांचा एन्काऊंटर केला आहे. दोन्ही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमधील बहराइच जिल्ह्यात देवीच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान, दोन गटात वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. या दरम्यान, रामगोपाल नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेशपोलिसांनी मोठी करावाई करत या प्रकरणातील आरोपी असलेल्या सफराज आणि फईम यांचा एन्काऊंटर केला आहे. दोन्ही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अब्दुल हमीदचे मुलगे आहेत. या हिंसाचार प्रकरणी आणखी पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

बहराइच हिंसाचार प्रकरणातील आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. याची गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागली.  पोलिसांनी मागावर राहून त्यांचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर नेपाळच्या सीमेजवळ हांडा बसेहरी नहर येथे झालेल्या चकमकीत दोन्ही आरोपींना गोळ्या लागल्या. दरम्यान, आरोपींच्या पायाला गोळ्या लागल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. 

दोन्ही आरोपी हे बहराइच हिंसेदरम्यान मारल्या गेलेल्या रामगोपाल मिश्रा याच्या हत्येमध्ये सहभागी होते, असा दावा करण्यात येत आहे. त्यांनीच इतर सहकाऱ्यांसोबत मिळून गोळीबार केल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचे काही व्हिडीओही व्हायरल होत. आहेत. त्यात अब्दुल हमीद याच्या घराच्या छतावर चार ते पाच लोक दिसून येत आहेत. तिथेच रामगोपाल मिश्रा याच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.

दरम्यान, गोपाल मिश्रा याच्यावर ज्या घराच्या छतावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्या घराचा मालक अब्दल हमीद याची मुलगी रुखसार हिने मात्र वेगळाच आरोप केला आहे. तिने सांगितले की, तिचे वडील, सरफराज आणि फहीम हे दोन भाऊ आणि आणखी एका तरुणाला उत्तर प्रदेश एसटीएफने काल संध्याकाळी ४ वाजता ताब्यात घेतले होते. दरम्यान, तिचा पती आणि दिराला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते, असा आरोपही तिने केला.

बहराइचमधील हरदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेहुआ मंसूर गावामधील रहिवासी असलेल्या रामगोपाल मिश्रा याची रविवारी संध्याकाळी ६ वाजता दुर्गा विसर्जनादरम्यान, झालेल्या वादावेळी हत्या करण्यात आली होती. विसर्जन मिरवणूक महराजगंज येथील एका वस्तीजवळ आली असताना दोन्हीकडून वादावादी झाली आणि त्यादरम्यान छतांवरून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत पळापळ झाली. या दरम्यान, रामगोपाल याच्यावर एका घराच्या छतावर असताना गोळ्या झाडण्यात आल्या. रामगोपाल याच्या हत्येनंतर परिसरातील तणाव आणखीनच वाढला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस