शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

विकसित आणि समर्थ उत्तर प्रदेश स्वप्न बनले जनआंदोलन, 60 लाख लोकांनी केल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:28 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संकल्पनेतून २०४७ पर्यंत उत्तर प्रदेशला विकसित राज्य बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी लोकांच्या सूचनाही मागण्यात आल्या. त्यात ६० लाख लोकांनी सहभाग घेतला. 

उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशला 2047 पर्यंत विकसित राज्य बनवण्याचा निर्धार केला आहे. 'समर्थ उत्तर प्रदेश-विकसित उत्तर प्रदेश @2047: समृद्धीचे शताब्दी पर्व महा अभियान' असे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ही एक व्यापक लोकचळवळ बनत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत 60 लाखांहून अधिक सूचना (फीडबॅक) प्राप्त झाल्या आहेत, ज्यापैकी 75 टक्क्यांहून अधिक सूचना ग्रामीण भागातील लोकांनी केल्या आहेत.

समर्थ उत्तर प्रदेश-विकसित उत्तर प्रदेश @2047 या अभियानात राज्यातील ७५ जिल्ह्यांमध्ये नोडल अधिकारी आणि प्रबुद्ध नागरिकांनी विविध लक्ष्य गटांना (विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक, शेतकरी, स्वयंसेवी संस्था, कामगार संघटना, माध्यम प्रतिनिधी आणि सामान्य नागरिक) भेटून संवाद साधला. राज्याच्या विकास वाटचालीवर आणि भविष्यातील रोडमॅपवर लोकांची मते जाणून घेण्यात आली. 

६० लाख लोकांच्या सूचना

आतापर्यंत samarthuttarpradesh.up.gov.in या पोर्टलवर सुमारे ६० लाख सूचना (फीडबॅक) करण्यात आल्या आहेत. यातील ७५ टक्क्यांहून अधिक सूचना ग्रामीण भागातून मिळाल्या आहेत.

लोकांच्या मनात काय, प्रमुख सूचना आणि मागण्या वाचा

बुलंदशहरच्या रिकेश कुमार यांनी ग्रामीण भागात उद्योग आणि शिक्षणावर विशेष लक्ष देण्याची मागणी केली. पीपीपी मॉडेलद्वारे ग्रामीण भागातील तरुणांना प्राधान्य मिळाल्यास स्थलांतर थांबेल, असे त्यांनी सांगितले. 

शकील खान यांनी राज्याला औद्योगिक केंद्र बनवण्यासाठी एमएसएमईला (MSME) सुलभ कर्ज, तांत्रिक सहकार्य आणि जिल्हा-आधारित उद्योग पार्कची गरज व्यक्त केली.

निगार फातिमा यांनी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम, हाय-टेक उत्पादन आणि महिला कौशल्य मिशनवर भर दिला. सीमा कुमारी यांनी भरतकाम, शिवणकाम आणि अगरबत्ती बनवणे यासारख्या कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्याची मागणी केली.

जोगिंदर सिंह यांनी शालेय स्तरापासूनच शिक्षण व्यावहारिक आणि कौशल्य-आधारित बनवण्याची मागणी केली, जेणेकरून तरुण आत्मनिर्भर होऊ शकतील.

अंकित गुप्ता यांनी माँ बेला देवी धाम आणि शनिदेव मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांच्या विकासावर जोर दिला. डॉ. सुनील शाह यांनी बेल्हा देवी मंदिराच्या आसपास कॉरिडॉर बांधण्याचा, तर रीता जयस्वाल आणि रामेंद्र त्रिपाठी यांनी पर्यटन स्थळांवर सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची गरज व्यक्त केली.

बलियाच्या गीता देवी यांनी खेलो इंडिया सारख्या कार्यक्रमांचा स्थानिक स्तरावर विस्तार करण्याची सूचना केली, तर प्रदीप कुमार यांनी गावांमध्ये डिजिटल लायब्ररी आणि रोजगार निर्मिती केंद्रे सुरू करण्याची मागणी केली.

प्रशासन आणि सुरक्षा

गाझियाबादच्या राजेश अग्निहोत्री यांनी स्वच्छ प्रशासन, चांगली कायदा सुव्यवस्था आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली. बस्तीच्या शाइस्ता फिरोज यांनी महिला सुरक्षा, कौशल्य मिशन आणि बाल विकास योजनांना बळकटी देण्यावर जोर दिला.

अभियानातील महत्त्वपूर्ण आकडेवारी

प्राप्त झालेल्या सुमारे ६० लाख सूचनांपैकी, ३० लाख सूचना ३१ वर्षांखालील तरुणांनी दिल्या आहेत. विविध क्षेत्रांतील सूचनांमध्ये कृषी (१६ लाख) आणि शिक्षण (१५ लाख) हे सर्वात मोठे फोकस सेक्टर ठरले आहेत. याशिवाय, ग्रामीण विकास (१२ लाख), समाज कल्याण (५ लाख), आरोग्य (४ लाख), आणि उद्योग (२.५ लाख) यांवरही मोठ्या प्रमाणात सूचना मिळाल्या आहेत.

मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्या 'समर्थ उत्तर प्रदेश-विकसित उत्तर प्रदेश @२०४७' अभियानानुसार, प्राप्त झालेल्या या ६० लाख सूचनांच्या आधारावर आता व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Uttar Pradesh's development vision 2047: 6 million public suggestions received.

Web Summary : Uttar Pradesh aims to become a developed state by 2047, gathering 6 million suggestions from citizens. Focus areas include rural development, agriculture, education, and industrial growth, with a vision document being prepared based on the feedback.
टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री