शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

धक्कादायक! पती व दोन मुलांचा खून करुन स्वत:ही संपवले जीवन, जिल्ह्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 11:55 IST

बलिया जिल्ह्याच्या बांसडीह पोलीस ठाणे हद्दीतील देवडीह गावातील ही घटना

उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने अगोदर आपल्या दोन्ही मुलांचा निर्दयीपणे खून केला. त्यानंतर, पत्नीला जीवे मारुन स्वत: फाशी घेत आत्महत्या केली. या घटनेने जिल्हा हादरला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, मृत्युपूर्वी व्यक्तीने चिठ्ठी लिहिली आहे, त्यात पत्नीकडून त्रास दिला जात असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होता, असेही समजते. 

बलिया जिल्ह्याच्या बांसडीह पोलीस ठाणे हद्दीतील देवडीह गावातील ही घटना असून कौटुंबिक वादातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासातून पुढे येत आहे. पतीने धारदार शस्त्राने पत्नीसह स्वत:च्या दोन मुलांची हत्या केली आहे. त्यानंतर, स्वत: फाशी घेऊन जीवन संपवले. या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्वच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. 

अंकित राम यांनी बासंडीह पोलीस ठाण्यात येऊन संबंधित घटनेची माहिती दिली. अंकींत यांचे मेव्हुणे श्रवण राम हे त्यांच्या बहिणीसोबत सातत्याने मारहाण करत होते. पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन घटनास्थळी धाव घेतली असून पत्नी शशीकला आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह घराजवळील बगीचामध्ये आढळून आले. एका मृत मुलाचे नाव सूर्या राव (७ वर्षे), तर दुसऱ्याचे नाव मिट्टू (४ वर्षे) आहे. पोलिसांना तीनही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. 

घरासमोरील बगीचामध्ये पत्नी आणि मुलांचे मृतदेह फेकल्यानंतर श्रवण रामने तेथीलच एका झाडाला फाशी घेऊन स्वत:ही जीवन संपवले. पोलिसांनी श्रवण रामचा मृतदेह झाडावरुन खाली उतरवल्यानंतर पंचनामा केला असता, त्याच्या खिशाथ आत्महत्यापूर्वी चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये, कौटुंबिक कलहातूनच आपण हत्या आणि आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे. 

दरम्यान, यापूर्वीच पती-पत्नीचा न्यायालयात वाद सुरू होता. मात्र, दीड वर्षांपूर्वी शशीकला पुन्हा एकदा पतीच्या घरी सासरी येऊन राहत होती. पण, पती-पत्नीमध्ये पुन्हा वादावादी होऊ लागली. याच वादातून श्रवण रामने पत्नीसह मुलांचा खून करुन स्वत:ही आत्महत्या केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश