शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

धक्कादायक! पती व दोन मुलांचा खून करुन स्वत:ही संपवले जीवन, जिल्ह्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 11:55 IST

बलिया जिल्ह्याच्या बांसडीह पोलीस ठाणे हद्दीतील देवडीह गावातील ही घटना

उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने अगोदर आपल्या दोन्ही मुलांचा निर्दयीपणे खून केला. त्यानंतर, पत्नीला जीवे मारुन स्वत: फाशी घेत आत्महत्या केली. या घटनेने जिल्हा हादरला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, मृत्युपूर्वी व्यक्तीने चिठ्ठी लिहिली आहे, त्यात पत्नीकडून त्रास दिला जात असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होता, असेही समजते. 

बलिया जिल्ह्याच्या बांसडीह पोलीस ठाणे हद्दीतील देवडीह गावातील ही घटना असून कौटुंबिक वादातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासातून पुढे येत आहे. पतीने धारदार शस्त्राने पत्नीसह स्वत:च्या दोन मुलांची हत्या केली आहे. त्यानंतर, स्वत: फाशी घेऊन जीवन संपवले. या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्वच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. 

अंकित राम यांनी बासंडीह पोलीस ठाण्यात येऊन संबंधित घटनेची माहिती दिली. अंकींत यांचे मेव्हुणे श्रवण राम हे त्यांच्या बहिणीसोबत सातत्याने मारहाण करत होते. पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन घटनास्थळी धाव घेतली असून पत्नी शशीकला आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह घराजवळील बगीचामध्ये आढळून आले. एका मृत मुलाचे नाव सूर्या राव (७ वर्षे), तर दुसऱ्याचे नाव मिट्टू (४ वर्षे) आहे. पोलिसांना तीनही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. 

घरासमोरील बगीचामध्ये पत्नी आणि मुलांचे मृतदेह फेकल्यानंतर श्रवण रामने तेथीलच एका झाडाला फाशी घेऊन स्वत:ही जीवन संपवले. पोलिसांनी श्रवण रामचा मृतदेह झाडावरुन खाली उतरवल्यानंतर पंचनामा केला असता, त्याच्या खिशाथ आत्महत्यापूर्वी चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये, कौटुंबिक कलहातूनच आपण हत्या आणि आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे. 

दरम्यान, यापूर्वीच पती-पत्नीचा न्यायालयात वाद सुरू होता. मात्र, दीड वर्षांपूर्वी शशीकला पुन्हा एकदा पतीच्या घरी सासरी येऊन राहत होती. पण, पती-पत्नीमध्ये पुन्हा वादावादी होऊ लागली. याच वादातून श्रवण रामने पत्नीसह मुलांचा खून करुन स्वत:ही आत्महत्या केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश