शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
3
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
4
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
5
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
6
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
7
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
8
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
9
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
10
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
11
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
12
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
13
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
14
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
15
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
16
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
17
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
18
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
19
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
20
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 

“संतांची फसवणूक झाली, सत्तेत राहायचा अधिकार नाही, योगींनी राजीनामा द्यावा”: शंकराचार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 21:52 IST

Maha Kumbh Mela 2025 Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati News: महाकुंभमेळ्यात झालेल्या प्रकाराबाबत शं‍कराचार्यांनी तीव्र शब्दांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Maha Kumbh Mela 2025: प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले. त्या ठिकाणी ब्रह्म मुहूर्तावर झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही याबाबत तीव्र संवेदना व्यक्त केल्या. परंतु, यावरून ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी संताप व्यक्त करत योगी आदित्यनाथ यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, प्रयागराजमधील परम धर्म संसदेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हे लोक सत्तेत राहण्यास सक्षम नाहीत. जनतेपासून माहिती लपवली आहे. संत समाजासोबत मोठी फसवणूक झाली आहे. एवढ्या मोठ्या चेंगराचेंगरीची माहिती मिळाल्यानंतर आम्ही शाही स्नान करणार नव्हतो, तेव्हा त्यांनी आम्हाला चुकीची माहिती दिली. त्यामुळे आम्ही मृतांना श्रद्धांजली न वाहता किंवा त्यांच्याबाबत मौन पाळून संवेदना व्यक्त न करता शाही स्नान केले. आमच्यापासून माहिती लपवण्यात आली हे खूप दुःखद आहे. मृत आणि जखमींचे आकडेही उशिरा देण्यात आले, परंतु आम्हाला योग्य माहिती देण्यात आली नाही. २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आम्ही नवीन लोकांना सत्तेत आणू. आगामी निवडणुकीत आपण नवीन पक्ष किंवा नवीन नेत्याना संधी देऊ. २०२७ च्या निवडणुकीत सध्याच्या सरकारला पाठिंबा देणार नाही, या शब्दांत शं‍कराचार्यांनी हल्लाबोल केला.

योगी आदित्यनाथ यांना तत्काळ मुख्यमंत्रीपदावरून हटवावे

शंकराचार्य पुढे म्हणाले की, जखमींचे आकडे जगभर प्रसारित केले जात होते, परंतु उत्तर प्रदेश प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी जाहीर केले. आम्हाला मृतांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी मौन पाळण्याची संधीही मिळाली नाही. पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी योगी आदित्यनाथ यांना तत्काळ मुख्यमंत्रीपदावरून हटवावे. तरीही कोट्यवधी लोक इथे येणार आहेत, त्यांना गर्दी सांभाळता येत नाही, अशी टीका स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली.

१ हजार लोकांची व्यवस्था असेल तर तिथे ५ हजारांना आमंत्रित करायचे नसते

मुख्यमंत्री योगी यांच्यासह सर्व सरकारी सोशल मीडिया अकाउंटवर घटनेची योग्य माहिती देण्याऐवजी लोकांना अफवांवर लक्ष देऊ नका, असे आवाहन केले जात होते. अशा परिस्थितीत अनेक धर्माचार्यांना या घटनेची माहिती मिळाली नाही. घटनेची माहिती योग्य वेळी मिळाली असती तर परंपरांचे पालन केले असते. महाकुंभमेळ्यातील तयारी अपूर्ण राहिली. लोकांच्या जीवाशी खेळण्यात आले. आपल्या घरच्या कोणत्याही कार्यक्रमात १ हजार लोकांची व्यवस्था असेल तर तिथे ५ हजार लोकांना आमंत्रित करायचे नसते. महाकुंभमेळ्यात हेच घडले. ४० कोटी भाविक महाकुंभमेळ्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असेल, तर तशी व्यापक सोय करायला हवी होती. परंतु, ते होताना दिसले नाही, असे सांगत शं‍कराचार्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे मोठे अपयश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे मोठे अपयश आहे. अशा सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. सरकारने स्वतःहून पायउतार व्हावे किंवा जबाबदार लोकांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा. ही इतकी दुःखद घटना आहे की त्यामुळे संत-महंतांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी काळात दररोज लाखो भाविक येतील. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळात यापेक्षा मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर अत्यंत कठोर कारवाई आवश्यक आहे, असे शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, परम धर्म संसदेदरम्यान महाकुंभमेळ्यातील सरकार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा उल्लेख करून आणि चेंगराचेंगरीनंतर झालेल्या मृतांची संख्या लपवल्याबद्दल संताप व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. धर्म संसदेत सहभागी झालेल्या सर्व लोकांनी या प्रस्तावाला एकमताने संमती दिली. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण