शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

८ वर्षात १८ वेळा बदली! IPS प्रभाकर चौधरी यांचे वडील संतापले; म्हणाले, मी भाजपच्या विरोधातच राहणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 09:11 IST

काही दिवसापूर्वी बरेलीतील कंवारी येथे लाठीचार्ज झाला होता. या प्रकरणानंतर अवघ्या तीन तासांत आयपीएस प्रभाकर चौधरी यांची बदली करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेश येथील बरेली येथील कंवारी येथे पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या प्रकरणानंतर अवघ्या तीन तासात आयपीएस प्रभाकर चौधरी यांची बदली करण्यात आली होती. आता उत्तर प्रदेशमध्ये या बदलीची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या ८ वर्षात १५ जिल्ह्यांचे नेतृत्व करणाऱ्या प्रभाकर चौधरी यांची १८ वेळा बदली झाली आहे. याबाबत आयपीएस प्रभाकर चौधरी यांचे वडील पारसनाथ चौधरी यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. आजपासून आपण भाजपच्या विरोधात राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

मणिपूरमधील स्थितीमुळे १४ हजार मुलं  विस्थापित, सोडावे लागले घर

पारस नाथ चौधरी म्हणाले, 'यापुढील निवडणुकीत काही भागात भाजपला कदापि जिंकू दिले जाणार नाही. "प्रभाकर यांच्या बदलीचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा. त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच त्यांची बदली झाली. ते नेत्यांपासून अंतर राखतात. प्रभारकर त्यांचे म्हणणे ऐकत नाहीत कारण नेत्यांना चुकीची कामे करायची आहेत. प्रभाकर जेव्हा भाजप नेत्यांचे ऐकत नाहीत तेव्हा त्यांना त्यांचा राग येतो. त्यामुळेच दोन-तीन महिन्यांत प्रभाकर यांची बदली होते. 

'प्रभाकर यांची बदली करायची इतकी सवय झाली आहे की तो चार-सहा महिन्यांत स्वतःहून जिल्ह्यात किंवा राज्यात राहतो. त्यांना माहीत आहे की त्यांची पुन्हा बदली होणार आहे. प्रभाकर यांनी तिथे चांगले काम केले. त्यादिवशी जराही दुर्लक्ष झाले असते तर जवळपास १० ते २० कानवऱ्यांचा बळी गेला असता. पण चांगल्या कामाचे फळ खूप वाईट होते. याबद्दल आम्हाला खूप खेद वाटतो, असंही चौधरी म्हणाले. 

पारस नाथ म्हणाले, 'मी यापूर्वी भाजपचा पदाधिकारी होतो. पण आजपासून मी भाजपच्या विरोधात राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही मोठा माणूस नाही, पण माझी १० ते २० क्षेत्रांवर इतकी पकड आहे की मी तिथे भाजपला कधीही जिंकू देणार नाही. कारण त्यांनी माझ्या मुलावर अन्याय केला. त्यांच्या प्रामाणिकपणाच्या बदल्यात त्यांची बदली करण्यात आली." कंवरियांवर लाठीचार्ज झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत प्रभाकर चौधरी यांची लखनौला बदली झाली. त्यांना एसएसपीमधून सेनानायक बनवून त्यांचा दर्जा कमी केल्याचे बोलले जात आहे. प्रभाकर चौधरी यांच्या जागी सीतापूरचे एसपी सुशील चंद्रभान धुळे यांना बरेलीचे नवे एसएसपी बनवण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता कंवरियांवर लाठीचार्ज केल्याचे प्रकरण समोर आले. यानंतर बदलीचे आदेश आले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसBJPभाजपा