शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

८ वर्षात १८ वेळा बदली! IPS प्रभाकर चौधरी यांचे वडील संतापले; म्हणाले, मी भाजपच्या विरोधातच राहणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 09:11 IST

काही दिवसापूर्वी बरेलीतील कंवारी येथे लाठीचार्ज झाला होता. या प्रकरणानंतर अवघ्या तीन तासांत आयपीएस प्रभाकर चौधरी यांची बदली करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेश येथील बरेली येथील कंवारी येथे पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या प्रकरणानंतर अवघ्या तीन तासात आयपीएस प्रभाकर चौधरी यांची बदली करण्यात आली होती. आता उत्तर प्रदेशमध्ये या बदलीची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या ८ वर्षात १५ जिल्ह्यांचे नेतृत्व करणाऱ्या प्रभाकर चौधरी यांची १८ वेळा बदली झाली आहे. याबाबत आयपीएस प्रभाकर चौधरी यांचे वडील पारसनाथ चौधरी यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. आजपासून आपण भाजपच्या विरोधात राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

मणिपूरमधील स्थितीमुळे १४ हजार मुलं  विस्थापित, सोडावे लागले घर

पारस नाथ चौधरी म्हणाले, 'यापुढील निवडणुकीत काही भागात भाजपला कदापि जिंकू दिले जाणार नाही. "प्रभाकर यांच्या बदलीचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा. त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच त्यांची बदली झाली. ते नेत्यांपासून अंतर राखतात. प्रभारकर त्यांचे म्हणणे ऐकत नाहीत कारण नेत्यांना चुकीची कामे करायची आहेत. प्रभाकर जेव्हा भाजप नेत्यांचे ऐकत नाहीत तेव्हा त्यांना त्यांचा राग येतो. त्यामुळेच दोन-तीन महिन्यांत प्रभाकर यांची बदली होते. 

'प्रभाकर यांची बदली करायची इतकी सवय झाली आहे की तो चार-सहा महिन्यांत स्वतःहून जिल्ह्यात किंवा राज्यात राहतो. त्यांना माहीत आहे की त्यांची पुन्हा बदली होणार आहे. प्रभाकर यांनी तिथे चांगले काम केले. त्यादिवशी जराही दुर्लक्ष झाले असते तर जवळपास १० ते २० कानवऱ्यांचा बळी गेला असता. पण चांगल्या कामाचे फळ खूप वाईट होते. याबद्दल आम्हाला खूप खेद वाटतो, असंही चौधरी म्हणाले. 

पारस नाथ म्हणाले, 'मी यापूर्वी भाजपचा पदाधिकारी होतो. पण आजपासून मी भाजपच्या विरोधात राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही मोठा माणूस नाही, पण माझी १० ते २० क्षेत्रांवर इतकी पकड आहे की मी तिथे भाजपला कधीही जिंकू देणार नाही. कारण त्यांनी माझ्या मुलावर अन्याय केला. त्यांच्या प्रामाणिकपणाच्या बदल्यात त्यांची बदली करण्यात आली." कंवरियांवर लाठीचार्ज झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत प्रभाकर चौधरी यांची लखनौला बदली झाली. त्यांना एसएसपीमधून सेनानायक बनवून त्यांचा दर्जा कमी केल्याचे बोलले जात आहे. प्रभाकर चौधरी यांच्या जागी सीतापूरचे एसपी सुशील चंद्रभान धुळे यांना बरेलीचे नवे एसएसपी बनवण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता कंवरियांवर लाठीचार्ज केल्याचे प्रकरण समोर आले. यानंतर बदलीचे आदेश आले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसBJPभाजपा