शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर...; 72 तासांत 54 मृत्यू, एकट्या 15 जूनला 23 जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 9:18 AM

बलिया येथे गेल्या 15 ते 17 जून या तीन दिवसांत ताप, श्वास घेण्यास त्रास आदी कारणांमुळे जवळपास 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऊन आणि गर्मीने कहर केला आहे. लोक गर्मीमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे घरातून बाहेर पडणेही अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटांचा त्रास जाणवत आहे. यातच, उत्तर प्रदेशातील बलिया येथील उष्णता आणि गर्मीमुळे रुग्ण आणि मृतांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. 

बलिया येथे गेल्या 15 ते 17 जून या तीन दिवसांत ताप, श्वास घेण्यास त्रास आदी कारणांमुळे जवळपास 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. यांपैकी 15 जूनला 23, 16 जूनला 20 तर 17 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत 11, म्हणजेच एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, हा आकडा केवळ जिल्हा रुग्णालयातील आहे. यावरूनच संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थिती काय असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

आजमगड विभागातील अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ बीपी तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढला आहे. या मागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी लखनऊवरून एक चमू येत आहे. हाचा शोध घेईल. याशिवाय, जेव्हा उष्णता अथवा थंडी अधिक असते तेव्हा श्वसनाचा त्रास असलेले रुग्ण, मधुमेही, रक्तदाबाची समस्या असलेले रुग्ण यांना धोका वाढतो. त्यामुळे तापमान वाढीचा अशा रुग्णांवर परिणाम होऊ शकतो. कदाचित यामुळेही मृत्यू होत असावेत, अशेही ते म्हणाले.

तीन दिवसांत 400 रुग्ण दाखल - यासंदर्भात बोलताना प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. के. यादव म्हणणे. जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत. गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास चारशे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSun strokeउष्माघातhospitalहॉस्पिटल