शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

प्रेमाला 'सीमा' नाही! प्रेमी युगुल एक महिना झाले बेपत्ता; अखेर घरच्यांची कबुली पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 19:52 IST

प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.

प्रेम आंधळं असतं प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही, असं नेहमी बोललं जातं. पण याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील प्रेमी युगुलानं घरच्यांचा विरोध डावलून लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोघे फरार देखील झाले मग पोलिसांच्या मध्यस्थीमुळं त्यांचं लग्न लागलं. संबंधित तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. मात्र, तोपर्यंत या दोघांनी राज्याची सीमा ओलांडली होती. अखेर हे प्रेमी युगुल गुजरातमध्ये सापडलं. 

दरम्यान, पोलिसांनी नातेवाईकांना माहिती देताच त्यांनी जवळच्या मंदिरात लग्न लावण्याचा निर्णय घेतला. कानपूर येथील बैजू पुरवा या गावातील प्रवीण याचं जवळच्या गावातील तरूणीशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी आपापल्या घरी याची माहिती दिली होती. पण, घरच्यांचा विरोध पाहता त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. 

अखेर घरच्यांची कबुली १० मार्च रोजी प्रवीण प्रेयसीला घेऊन गुजरातमधील अहमदाबाद इथं गेला. प्रेयसीच्या घरच्यांनी सगळीकडं तपास करूनही ती सापडली नसल्यानं पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी बेपत्ता म्हणून तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला. एक महिन्यानंतर ८ एप्रिल रोजी पोलिसांना हे प्रेमी युगुल सापडलं. यानंतर दोघांशी चर्चा करून त्यांना समज देण्यात आली. मग पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. पोलिसांनी सांगितल्यानंतर दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी लग्नास होकार दिला. यानंतर एका मंदिरात विवाहसोहळा पार पडला. खरं तर लग्नासाठी घरच्यांची कबुली मिळाली असली तरी यामुळं त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसmarriageलग्न