शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

"१००  घेऊन या, अन् सरकार बनवा’’ अखिलेश यादव यांची भाजपातील असंतुष्टांना मान्सून ऑफर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 13:00 IST

Uttar Pradesh Political Update: उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपामधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) हे आमने सामने आल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही भाजपामधील (BJP) या सत्तासंघर्षादरम्यान आपली चाल खेळत या असंतुष्टांना मान्सून ऑफर दिली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपामधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे आमने सामने आल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या लखनौपासून दिल्लीपर्यंत बैठकांवर बैठका होत आहेत. वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपामधील या वादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी सुरू केला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही भाजपामधील या सत्तासंघर्षादरम्यान आपली चाल खेळत या असंतुष्टांना मान्सून ऑफर दिली आहे. ''१०० घेऊन या आणि सरकार बनवा’’, अशी ऑफर त्यांनी दिली आहे. 

''१०० घेऊन या आणि सरकार बनवा’’ म्हणजेच १०० आमदारांना सोबत घेऊन या आणि समाजवादी पक्षासोबत उत्तर प्रदेशात सरकार बनवा, असे सूचक आवाहन या माध्यमातून अखिलेख यादव यांनी भाजपामधील असंतुष्टांना केले आहे. अखिलेश यादव यांनी ही ऑफर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना उद्देशून दिल्याचं बोललं जात आहे. योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून मतभेद उफाळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अखिलेख यादव यांनी या वादावर खोचक टिप्पणी करत दिलेली ही ऑफर उत्तर प्रदेशच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. 

याआधीही अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपामधील सत्तासंघर्षावर टीका केली होती. भाजपामध्ये खुर्चीसाठी चाललेल्या लढाईमुळे उत्तर प्रदेशातील शासन आणि प्रशासन कोलमडलं आहे. भाजपा इतर पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण करायचा. मात्र आता त्यांच्याच पक्षामध्ये अंतर्गत फोडाफोडी सुरू आहे. त्यामुळे भाजपा अंतर्गत वादात अडकत चालली असून, त्या पक्षामध्ये जनतेबाबत विचार करणारा कुणी राहिलेला नाही, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला होता.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तर प्रदेशमधील भाजपामध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलेल्या विधानानंतर भाजपामधील मतभेद उघडपणे समोर आले होते. पक्ष संघटना ही सरकारपेक्षा मोठी असते. संघटनेपेक्षा मोठं कुणीच नाही. प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा गौरव आहे, असं विधान मौर्य यांनी केलं होतं, तेव्हापासून भाजपामधील हा सत्तासंघर्ष उघडपणे समोर आला आहे.   

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा