शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सुंदर आणि भव्य वास्तूशिल्पांसाठी ओळखलं जातं 'महाबलीपुरम'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 15:39 IST

चेन्नईपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला स्थित आहे महाबलीपुरम. सागरी किनाऱ्यावर असलेलं हे प्राचीन मंदिर त्याकाळातील इंजिनियरिंगचा उत्तम नमूना आहे.

(Image Credit : TripSavvy)

चेन्नईपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला स्थित आहे महाबलीपुरम. सागरी किनाऱ्यावर असलेलं हे प्राचीन मंदिर त्याकाळातील इंजिनियरिंगचा उत्तम नमूना आहे. येथे असणारं मंदिर आणि स्थळांचे अवशेष त्याकाळातील भव्यतेचं दर्शन घडवतात. महबलीपुरमची स्थापना पल्लव राजांद्वारे करण्यात आली होती. जाणून घेऊयात या ठिकाणाची वैशिष्ट्य... 

(Image Credit : viator.com)

महाबलीपुरम हे ठिकाण मल्लापुरम या नावानेही ओळखलं जातं. येथे असलेले पंच रथ पल्लव वंशाच्या राजांच्या वीरगाथेची ग्वाही देत आहेत. या रथांची प्रतिमा मोठ्या मोठ्या दगडांना पैलू देऊन साकारण्यात आली आहे. येथे असलेली मंदिरं आणि गुहा इसवीसन 600 ते 700 शतकामध्ये साकारण्यात आली आहेत. 

(Image Credit : The Mysterious India)

इतिहासकारांच्या मते, प्राचीन काळामध्ये पुरूष वर्गामध्ये आपली शारीरिक शक्ती राखण्याचा प्रभाव होता. त्यामुळे त्याकाळातील लोक मल्ल युद्ध किंवा कुस्ती यांसारख्या शारीरिक बल दाखवणाऱ्या खेळांना प्राथमिकता देत असतं. असं फक्त सैनिक किंवा सामान्य लोकांमध्ये होत नसे तर राजांमध्येही अशा स्पर्धा खेळवण्यात येत असतं. अशाच स्पर्धांमध्ये विजयी झाल्यानंतर आपला विजय साजरा करण्यासाठी आणि त्या दिवसाची आठवण ठेवण्यासाठी त्याकाळातील राजे मंदिर आणि गुहा तयार करत असत. त्यामुळेच महाबलीपुरममध्ये मोठ्या प्रमाणावर मंदिरं, धार्मिक स्थळं आणि कलात्मक गुहा पाहायला मिळतात. 

(Image Credit : wanderheads.com)

महाबलीपुरममध्ये ग्रेनाइटच्या दगडांना पैलू पाडून भव्य आणि जीवंत प्रतिमा तयार केल्या जात असत. आजही त्या ठिकाणी त्यावेळच्या काही प्रतिमा पाहायला मिळतात. हे ठिकाण भारतीय इतिहासामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण येथे प्राचीन काळातील अनेक ऐतिहासिक वास्तू आजही पाहता येतात. 

(Image Credit : commons.wikimedia.org)

वास्तूकला घडवणाऱ्या हातांना कदाचित हे ठाऊक होतं की, भविष्यामध्ये कदाचितच अशा वास्तूकला पाहायला मिळतील. त्यामुळेच त्यावेळच्या लोकांनी मोठ्या मोठ्या दगडांना पैलू देऊन रथ, मंदिर, मठ, आरमगाह यांसारख्या वास्तू घडवल्या. या संरचनांच्या बाहेरील आणि आंतरिक भाग तयार करण्यासाठी लहान डोंगरांनाही अत्यंत कल्पकतेने पैलू देण्यात आले. आज इतक्या वर्षांनीही या वास्तू अगदी जीवंत वाटतात. 

लोकेशन्सही आहेत सुंदर

या ठिकाणी जास्त वर्दळ नसते. तसेच येथून काही दूर अंतरावर समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांचा आनंद घेता येतो. तसेच दुसऱ्या बाजूला सुंदर कलाकृती आहेत. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण अत्यंत सुंदर आहे. 

कसे पोहोचाल? 

देशातील कोणत्याही महानगरातून तुम्ही प्लेन, बस किंवा ट्रेनच्या माध्यमातून चेन्नई अथवा तमिळनाडूपर्यंत पोहचू शकता. त्यानंतर येथून महाबलीपुरम येथे जाण्यासाठी प्रायवेट टॅक्सी करू शकता. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूChennaiचेन्नईTravel Tipsट्रॅव्हल टिप्सIndiaभारतtourismपर्यटन