शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

असा किल्ला ज्यावर तोफेगोळेही व्हायचे निकामी, १३ वेळा आक्रमण करून इंग्रज फिरले होते माघारी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 1:16 PM

भारतातील सगळेच किल्ले कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकप्रिय आहेत. असाच एक किल्ला राजस्थानच्या भरतपुरमध्येही आहे.

भारतातील सगळेच किल्ले कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकप्रिय आहेत. असाच एक किल्ला राजस्थानच्या भरतपुरमध्येही आहे. लोहगड(लोहागड) असं या किल्ल्याचं नाव आहे. कुणीही न जिंकू शकलेला हा भारतातील एकमेक किल्ला असल्याचं बोललं जातं. इतकेच काय तर इंग्रजांनीही इथे हार मानली होती.

या किल्ल्याची निर्मिती २८५ वर्षांआधी म्हणजे १९ फेब्रुवारी १७३३ ला जाट शासक महाराजा सूरजमल यांनी केली होती. त्या काळात बारूद आणि तोफेचा वापर अधिक होता. त्यामुळे हा किल्ला तयार करताना एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. ज्यामुळे तोफ गोळे किल्ल्याच्या भींतीवर पडूनही काहीच होत नव्हतं.

या किल्ल्याच्या निर्मितीच्या आधी एक रूंद आणि मजबूत दगडांची भींत तयार करण्यात आली. जेणेकरून तोफ गोळ्यांचा काहीच प्रभाव होऊ नये. त्यासाठी या भिंतीच्या चारही बाजूने शेकडो फूट कच्च्या मातीची भींत उभारण्यात आली आणि खाली खोल खड्डा करून त्यात पाणी टाकण्यात आलं. अशात जर दुश्मन सैन्याने पाणी पार केलं तरी ते सपाट भींतीवर चढू शकत नव्हते.

या किल्ल्यावर आक्रमण करणे कोणासाठीही सोपं नव्हतं. कारण तोफेतून निघणारे गोळे चिखलाच्या भींतीत घुसायचे आणि त्यांची आग विझली जायची. याने किल्ल्याचं काहीच नुकसान होत नव्हतं. त्यामुळेच दुश्मन किल्ल्याच्या आत प्रवेश मिळवू शकत नव्हते.

असे म्हणतात की, हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी १३ वेळा आक्रमण केलं होतं. इंग्रज सैन्यांनी इथे शेकडो तोफगोळे फेकले होते. पण काहीच झालं नाही. ते १३ पैकी एकदाही किल्ल्यात घुसू शकले नाहीत. असे म्हणतात की, इंग्रज पुन्हा पुन्हा हरल्यानंतर निराश झाले आणि तेथून निघून गेले होते. 

इतिहासकार जेम्स टाड यांच्यानुसार, या किल्ल्याची सर्वात मोठी खासियत याच्या भींती होत्या. या भींती मातीपासून तयार केल्या होत्या. पण तरी सुद्धा हा किल्ला ताब्यात घेणे म्हणजे लोखंडाचे चणे खाण्यासारखंच होतं. 

टॅग्स :FortगडRajasthanराजस्थानTravel Tipsट्रॅव्हल टिप्स