शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

राजस्थानच्या 'या' किल्ल्यावर झाली सर्वात जास्त आक्रमणे, १७०० वर्ष जुना आहे हा किल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 11:41 AM

राजस्थानमध्ये तसे तर अनेक किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या भव्यतेची चर्चाही नेहमी होत असते. देश-विदेशीतून हे किल्ले बघण्यासाठी पर्यटक येत असतात.

(Image Credit : TripAdvisor)

राजस्थानमध्ये तसे तर अनेक किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या भव्यतेची चर्चाही नेहमी होत असते. देश-विदेशीतून हे किल्ले बघण्यासाठी पर्यटक येत असतात. यातीलच एक किल्ला म्हणजे राजस्थानच्या हनुमानगडमधील भाटनेर किल्ला. हा किल्ला फार जुना आणि शानदार आहे. हा किल्ला भारतातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार आहे. 

या किल्ल्याच्या चारही बाजूने मरूस्थलने वेढलेला हा किल्ला राजस्थानच्या उत्तर सीमेकडे आहे. १८०५ मध्ये बिकानेरचे राजा सूरत सिंह यांनी हा किल्ला भाटियांकडून जिंकला होता. मंगळवारच्या दिवशी मिळवलेल्या या विजयाला हनुमानासोबत जोडलं गेलं आणि त्यानंतर या ठिकाणाचं नाव हनुमानगड ठेवलं गेलं. भटनेर किल्ल्याची बनावट आणि मजबूती अशी होती की, याचा उल्लेख स्वत: तैमूर लंग ने त्याच्या पुस्तकात केला होता. 

किल्ल्याची बनावट

या किल्ल्याचं निर्माण २८५ मध्ये भाटी राजा भूपत यांनी केलं होतं. किल्ला पक्क्या वीटा आणि चुन्याच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. यात ५२ बुर्ज आहेत. दरबारापर्यंत घोड्यावरून जाण्यासाठी खास रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यासोबतच किल्ल्याच्या आत हनुमानाचं मंदिर आणि शिवाचे काही मंदिरे आहेत. सोबत शेर शाह सूरीची समाधी सुद्धा आहे. 

(Image Credit : MouthShut.com)

किल्ल्याची खासियत

राजस्थानच्या या किल्ल्यावर अकबरपासून ते पृथ्वीराज चौहाना यांनी शासन केलं. हनुमानगडचा हा किल्ला साधारण १७०० वर्ष जुना आहे. याच किल्ल्यावर सर्वात जास्त आक्रमणे झाली होती. परदेशी आक्रमणांचं सांगायचं तर महमूद गजनवी ने १००१ मध्ये भटनेर किल्ल्यावर ताबा मिळवला होता. १३व्या शतकात गुलाम वंशाचे शासक बलबनचा चुलत भाऊ शेर खां ने इथे राज्य केलं. आणि १३९८ मध्ये तैमूर लंगने हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर तैमूर म्हणाला होता की, यापेक्षा सुरक्षित किल्ला हिंदुस्थानात दुसरा नाही. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन