शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बादशाह अकबरने आपला मुलगा सलीमला 'या' किल्ल्यात ठेवलं होतं नजरकैदेत, जाणून घ्या कुठे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 12:44 IST

Alwar Fort : १ हजार फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याचं निर्माण हसन खान मेवाती यांनी केलं होती. हा किल्ला अलवरमधील सर्वात जुन्या इमारतींपैकी एक आहे. 

Alwar Fort : मुघल बादशाह अकबरने मुलगा सलीम याला ज्या किल्ल्यात नजरकैद केलं होतं तो किल्ला अलवरमधील बाल किल्ला आहे. हा किल्ला अलवर या नावानेही ओळखला जातो. अरावलीच्या डोंगरामध्ये असलेल्या या किल्ल्याची भिंत संपूर्ण डोंगरावर पसरलेली आहे. १ हजार फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याचं निर्माण हसन खान मेवाती यांनी केलं होती. हा किल्ला अलवरमधील सर्वात जुन्या इमारतींपैकी एक आहे. 

किल्ल्याची बनावट

हा किल्ला त्याच्या बनावटीसाठी खासकरून प्रसिद्ध आहे. ५ किलोमीटर लांब आणि १.५ किलोमीटर रूंग बाल किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ५ दरवाजे आहेत. या किल्ल्यात जलमहल, निकुंभ महल, सलीम सागर, सूरज कुंड आणि काही मंदिरांचा पडलेला पाहता येऊ शकतो. किल्ल्याच्या आत जवळपास ३४० मीटर उंचीवर १५ मोठे आणि ५१ छोटे टॉवर लावण्यात आले आहेत. किल्ल्यात ८ मोठे बुर्ज आणि तोफांसाठी ४४६ छिद्रे आहेत. तसेच या किल्ल्यात राम मंदिर, हनुमानाचं मंदिर आहे. 

बाल किल्ल्याचा इतिहास

१५५१ मध्ये हसन खान द्वारे तयार करण्यात आलेल्या या किल्ल्याची शान आजही तशीच कायम आहे. या किल्ल्यावर मुघलांसोबतच मराठा आणि जाट शासकांनीही शासन केलं होतं. शेवटी १७७५ मध्ये कच्छवाहा राजपूत प्रताप सिंह यांना किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला होता. 

किल्ल्यात फिरण्याची वेळ

किल्ल्याच्या सुंदरतेचा आनंद तुम्ही सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजेपर्यंत घेऊ शकता. तसा तर अलवरमध्ये फिरण्यासाठी सर्वात चांगलं वातावरण ऑक्टोबर ते मार्च महिन्यात असतो. पावसाळ्यातही इथे फिरण्याची एक वेगळी मजा असते. 

कसे पोहोचाल?

अलवरला पोहोचण्यासाठी नवी दिल्लीचं इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्वात जवळ आहे. जयपूर ते अलवर अंतर सामान्यपणे १६२ किमी आहे. जयपूर आणि दिल्ली सोबतच उत्तर भारत आणि राजस्थानच्या वेगवेगळ्या शहरातून अलवरसाठी रेल्वेही आहेत. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके