अकोला व मूर्तिजापूर शहरासह ६४ खेडी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांची तहान भागविणारे येथील काटेपूर्णा धरणाचा जलसाठा १ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता ८० टक्क्यांवर पोहोचल्याने धरणाचे चार वक्रद्वार ३० सेंटीमिटरने उघडण्यात आले. ...
पुढील चारही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामध्ये ४ ऑगस्टपर्यंत सार्वत्रिक, तर ५ ऑगस्ट रोजी बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...
कारंजा तालुक्यातील पिंप्री फॉरेस्ट आणि मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक असलेल्या अडाण प्रकल्पाच्या पातळीत सततच्या पावसामुळे वाढ होत आहे. अशात पातळी नियंत्रित करण्यासाठी चार दिवसांपासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...
शेतातील मातीचा दर्जा टिकून राहिला तरच उत्पादनात भर पडणार आहे. ही बाब लक्षात घेऊन वाशिम तालुक्यातील ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेणे सुरू केले आहे. उत्पादित मालाच ...
सोयाबीनचे उत्पादन वाढत असले तरी दरात मात्र वाढ होताना दिसत नाही. दरवाढीची शेतकऱ्यांना आशा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा माल घरात पडून आहे. यामुळे शेतकरीवर्गाची चिंता वाढली असून, दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ...
अन्य पिकांच्या तुलनेत हळदीचे उत्पादन फायदेशीर ठरत असल्याने जिल्ह्यातील अधिकांश शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. मात्र, आवक वाढताच भाव पाडले जात असून गेल्या दोन महिन्यांत हळदीचे दर प्रतिक्विंटल दोन हजारांनी घसरल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. ...