लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विकास न झाल्याचा आरोप करून जिल्ह्यातील ११ गावांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला़ यात हदगाव तालुक्यातील सर्वाधिक सात गावांचा समावेश होता़ ...
एका बाजूला शासन मतदान वाढीसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे येथे रोजी-रोटीसाठी आलेली ३५ ते ४० कुटूंबे निवडणूकीपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. ...
सहा वाजेपर्यंत रांगेत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. ...