वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
मविआने प्लॅन बी देखील तयार ठेवला असल्याचे सुतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. वंचितने देखील स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. ...
हे सगळे मुद्दे घेऊन मुंबई आयुक्त इकबाल चहल आणि इतर अधिकारी यांच्याकडे आम्ही गेलो. मात्र ते साधे ऐकायला तयार नाहीत. मागील चार महिन्या पासून हे फिरवा फिरवीची उत्तरे देत आहेत असेही संघटक मनोज मर्चंडे यांनी सांगितले. ...