मागील हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ८ कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने साधारणतः १० कोटी टनांपर्यंत गाळप जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे; पण, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच उसाच्या उताऱ्याचा अंदाज येणार आहे. ...
ऊसतोड मजूर सहकुटुंब गोदाकाठ भागात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता दिवाळीनंतर ही गावे या मजुरांनी गजबजून गेली आहेत. पुढील काही महिने या मजुरांचा मुक्काम याच परिसरात राहणार असल्याने या गावांतील आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होऊन बाजारपेठा फुलल्या आहेत. ...