चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
Gautam Gambhir Team India Selection: हार्दिकला बाजुला सारत सूर्यकुमारला त्याने कप्तान केला. यापेक्षा लक्षवेधक बाब म्हणजे गंभीरने केकेआरच्या टीमममधील प्लेअरना संघात घेतले आहे. ...