जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन शेकडो दहशतवादी मारल्यानंतर सातारकरांनी मोती चौकात फटाके वाजवत साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पाकिस्तानचा निषेध करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागतही केले. तुम्ही ४० जवानांना मारले; पण आ ...
पाकिस्तानला सुगावा लागू नये म्हणून भारतीय वायु सेनेने देशातील 20 विमानतळांवरून 'मिराज'च्या विमानांचे उड्डाण केले. या मध्ये ग्वाल्हेर, भटिंडा, अंबाला या विमानतळांचा समावेश आहे. ...
'दहशतवाद मुळापासून उखडण्याचे अभियान सुरु झाले आहे. भारताकडे कोणी वाईट नजरेने पाहिले, तर त्याचा परिणाम जैशच्या दहशतवाद्यांचा झाला आहे, तसाच होईल. भारतीय वायु सेना आणि आमच्या जवानांच्या शौर्याला सलाम.' ...
भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त मोठी कारवाई करत पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. हल्ल्याच्या सर्व सुत्रधारांचा खात्मा केल्यानंतर आता भारतीय हवाई दलाने जैश ए मोहम्मदला मोठा दणका दिला. ...
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने जोरदार हवाईहल्ला करत अतिरेक्यांचा खात्मा केला. या माध्यमातून भारतीय जवानांनी 'पुलवामा' चा बदला घेतला आहे. या कारवाईबाबत जवानांचे अभिनंदन कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करीत ' भा ...