वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात आंदोलन केले होते. या आंदोलनापुरते पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमवारी उघडण्यात आले होते. यानंतर आंबेडकर यांच्यासह १५ जणांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. ...
मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. राज्य सरकारने आपल्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी दिली. ...
अॅड. आंबेडकरांनी या माध्यमातून आम्ही हिंदू विरोधी नाहीत, हे संकेत देत वंचितच्या राजकारणाला आणखी व्यापक करण्यासाठी टाकलेले हे पाऊल असल्याचे मानले जाते. ...
उद्धव सरकार मोदींच्या पावलावर पाऊल टाकत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यातील जनेतला ई-पास बंधनकारक असल्याने आंबेडकर यांनी सरकारच्या कारभाराला लक्ष्य केले. ...