डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी कोरडवाहू फळपिक आहे. प्रामुख्याने हे पिक महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात घेतले जाते. भगवा ही जात खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी डाळिंब निर्यातही केली जाते. Read More
सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची भीषण टंचाई भासत असून डाळिंब बागा जगवणे उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे पाणीच नसल्याने विकतचे पाणी आणून ठिबक सिंचनद्वारे बागांना सोडावे लागत आहे. ...
विकतचे पाणी परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. काहींनी थोड्या थोड्या पाण्यावर बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी कमी पडल्याने झाडांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे पुढील हंगामात किती उत्पादन देतील ही एक शंका आहे. ...
माणदेशातील क्रॉप पॅटर्न बदलू लागला आहे. ड्रॅगन फ्रुट, द्राक्षे, डाळिंब, बोर, कलिंगड, पपई, पेरू यासारख्या फळबागांची तसेच ढोबळी मिरची, शेवगा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ...