निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीपात्रात १५ दलघमी पाणी सोडण्यास परतूर, मंठ्याच्या नेते मंडळींकडून विरोध केला जात असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहानुभूतीची भूमिका दाखविण्याऐवजी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले जात असल्याबद्दल संताप व्यक्त केल ...
जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरात वन विभागाने उभारलेल्या सहा कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणीच नसल्याची बाब बुधवारी ‘लोकमत’ने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत समोर आली़ त्यामुळे वन विभागाचे नियोजन केवळ कागदोपत्रीच आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे़ त्याहीपेक ...
गोदावरी नदीकाठावरील मसला या गावाला सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्याने पात्र कोरडेठाक पडले असून, गावातील हातपंपांनाही पाणी राहिले नाही. परिणामी पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येथील ग्रा ...
शहरातील मोबाईल टॉवर धारकाकडून वसुली करण्यासाठी एजन्सी नेमल्याने मनपाच्या उत्पन्नात भर पडली असून या एजन्सीमार्फत रिलान्यस जिओ कंपनीकडून २ कोटी ६१ हजार २५० रुपये वसूल करण्यात आले आहेत. ...
तालुक्यातील आलापूर पांढरीसह सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी आणि पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे मंगळवारी आगीच्या घटना घडल्या असून कडबा, ऊस आणि शेती औजारे जळून खाक झाली आहेत. ...
राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे करण्यासाठी जिल्ह्याला ६ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून १२४ गावांमध्ये कामे करण्यात येणार आहेत. ...