गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने केवळ ५८ कोटी ८६ लाख रुयांचाच पीक विमा मंजूर केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गेल्या दोन खरीप हंगामापासून शेतकºयांच्या तोंडाला पीक विमा कंपन्या पाने पुसत असल्याचे दिसून येत आहे. ...
मनरेगा योजनेंतर्गत तुती लागवड आणि शेड बांधकामासाठी राज्य शासनाने अनुदान योजना सुरू केली असली तरी योजनेची कामे करूनही उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बोरगव्हाण येथील ९ शेतकऱ्यांची शेड बांधकामाची ४ लाख रुपयांची कुशल देयके वर्षभरापासून रखडली असल्याने ...
तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे जाळून मारण्यात आलेल्या मयत सतीश दत्तराव बरसाले खून प्रकरणातील ४ आरोपींना २० जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील सोस येथून अटक करण्यात आली आहे. ...
बदलत्या शैक्षणिक धोरणात भौतिक सुविधांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीवर अवलंबू न राहता जिंंतूर तालुक्यातील पांगरी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ३ लाख रुपयांचा निधी उभारत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भौतिक सुविधांची निर्मिती केली आहे. ...
जिल्हा खनिज प्रतिष्ठानंतर्गत जमा असलेल्या खनिज विकास निधीतून तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींना विविध विकास कामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. मंजुर निधी पैकी पन्नास टक्के म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपयांचा निधी पंचायत समितीने २० जून ...
वाळू भरताना पकडलेल्या जेसीबी मशीनवर कारवाई न करण्याच्या मागणीसाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकांसह एक शिपाई व एक खाजगी व्यक्ती अशा तिघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल ...
शहरात महानगरपालिकेच्या वतीने टँकरद्वारे वितरित करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. कालबाह्य झालेल्या वाहनातून पाणी वितरित करण्यात येणाºया एकाही टँकरला जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत दि ...